श्रीगोंदा २२६ विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचा उमेदवार सौ. अनुराधताई राजेंद्र नागवडे यांचा प्रचारार्थ महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री श्री. उद्धवजी ठाकरे साहेब… राष्ट्रीय काँग्रेसचे नेते माजी महसूलमंत्री श्री. बाळासाहेब थोरात… राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचा विद्यमान खाजदार सौ. फौजीया खान यांची जाहीर सभा शेख महंमद महाराज मंदिराचा प्रांगणात संपन्न झाली.
महराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री श्री. उद्धवजी ठाकरे यांनी आपल्याला भाषनात लोकसभा निवडणुकीत भाजपाला मोठ्या प्रमाणात मतदाणाची कडकी आल्यामुळे बहीण लाडकी योजना आणली…..पण आम्ही लाडक्या बहिणींना नुसते पैसे नाही तर महिलांना सुरक्षा पण देऊ असे आश्वासन दिले.
तसेच ठाकरे बोलताना म्हणाले कि श्रीगोंद्यातील साजन पाचपुते याच्यासाठी महायुतीकडे उमेदवारी मागितली होती मात्र त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून अनुराधा नागवडे यांना दिली त्यामुळे आमदार मी नाही तर पक्षाचा पाहिजे हि भूमिका त्यांनी बजावली श्रीगोंद्यातील शकुनी मामा आणि त्यांची माजलेली मांजरे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी केली आहे त्याच्या उमेदवारीने महाविकास आघाडीला काही फरक पडणार नाही कारण लोकसभा निवडणुकीत मोदी – शहा यांनी महाराष्ट्रात येऊन वेगवेगळी आमिषे दाखवली परंतु त्यांचा निभाव लागला नाही त्यामुळे अनेक ठिकाणी पराभव झाला आज श्रीगोंद्यात ४० वर्षांपासून अनेक प्रश्न प्रलंबित आहेत साकळाई कुकडी घोड पाण्याचा प्रश्न प्रलंबित आहेत त्यावर आजपर्यंत तोडगा निघाला नाही आता ते म्हणतात बोगदा करू पण त्यांनाच मतदान केल्यास तुमच्या आयुष्याचा बोगदा होईल पण प्रश्न सुटणार नाही त्यामुळे अनुराधा नागवडे यांना विजयी करा प्रश्न निकाली काढू आज भाजपाला साखर कारखाने आजारी पाडून मोदी शहा याना अदानी- अंबानी या मुगळ्यांच्या घश्यात घालायचे हे भाजपचे गणित आहे भाजपचे नेते जातात तिकडे खातात त्यांनी अनेक उद्योग धंदे गुजरातला पळविल्याने आपल्याकडे बेरोजगारी वाढली आहे शिवाजी महाराज्यांच्या पुतळ्यात पैशे खाणाऱ्यांना जनता निवडून देणार नाही आम्ही राज्यात प्रत्येक ठिकाणी नागपूर सुरत यासह अनेक ठिकाणी मंदिरे बांधणार असेही त्यांनी जनतेला संबोधित केले ते पुढे बोलताना म्हणाले कि आज महाराष्ट्रात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे बदलापूर प्रकरणात पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी एक तास बसविले त्यामुळे महिलांना पोलीस ठाण्यात जाण्याची भीती वाटते म्हणून महिलांची सुरक्षा धोक्यात आहे आज लाडक्या बहिणीला दीड नाही तर ३ हजार देणार पण पैश्याबरोबर सुरक्षेची गरज आहे आणि ती आम्ही देणार असेही ठाकरे म्हणाले ते म्हणाले शेतकरी अडचणीत आहे तुम्हाला शेतकऱ्याला मदत करायची आहे तर खते कीटकनाशके यासह शेतकऱ्यांना लागणाऱ्या सर्व वस्तूवरील जीएसटी हटवा तसेच जीवनावश्यक वास्तूचे दर कमी करा अशी मागणी त्यांनी केली आहे मुलींच्या बरोबरीने मुलांना पण मोफत शिक्षण देऊ असे बोलताना ठाकरे यांनी सांगितले यावेळी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले कि राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे महाविकास आघाडीचा मी एक सच्चा कार्यकर्ता आहे माझा सख्खा भाऊ विरोधात उभा राहिला तरी वृद्धात प्रचार करेल त्यामुळे बंडखोरी करणार नाही त्यासाठी श्रीगोंदा मतदार संघात राहुल जगताप यांनी अपक्ष उमेदवारी केलीय पण अजूनही वेळ गेलेली नाही त्यांनी त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून नागवडे याना पाठिंबा देऊन मतविभाजन टाळावे असेही थोरात म्हणाले यावेळी खासदार फौजिया खान,मिलिंद नार्वेकर,शुभानअली शेख,बाळासाहेब थोरात,शशिकांत गाडे, राजेंद्र नागवडे,यासह जिल्ह्यातील अनेक महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते त्यावेळी अथांग जनसागर उसळला होता कार्यक्रमाच्या शेवटी शिवसेना उपनेते साजन पाचपुते यांनी आभार मानले.
Discussion about this post