लवकर मुख्याधिकारी नियुक्ती न झाल्यांने रिपाइं तर्फे तीव्र आंदोलन करण्यचे सैदप्पा झळकी यांच्या इशारा
अक्कलकोट(तालुका प्रतिनिधी)दि:२५.अक्कलकोट तालुक्यातील दुधनी नगरपरिषदेसाठी कायमस्वरूपी मुख्याधिकारी नियुक्त करावा,अन्यथा रिपाइं(आठवले गट)च्या वतीने तीव्र आंदोलन छेडड्याच्या जिल्हा उपाध्यक्ष सैदप्पा झळकी यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांच्या कडे केली आहे.
अशी जोरदार मागणीचे निवेदन आज रिपब्लिकन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर केली आहे.दुधनी नगरपरिषदेचे माजी मुख्याधिकारी श्री.आतिश वाळूंज यांची बदली होऊन वर्षभराचा कालावधी उलटला आहे, मात्र अद्याप येथे नवे मुख्याधिकारी नेमण्यात आलेला नाही. सध्या अक्कलकोट नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री.रमाकांत डाके यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.मात्र,दुधनी शहराचा वेगाने होणारा विकास आणि लोकसंख्येच्या वाढीमुळे एकाच अधिकाऱ्याद्वारे दोन्ही नगरपरिषदांचे कामकाज पारपाडणे कठीण झाले आहे.

मुख्याधिकारी नसल्याने दुधनी शहरात अनेक समस्या निर्माण सामान्य नागरीकांचे हाल होत आहेत. आणी वारंवार वीजपुरवठा खंडित होणे, सफाई व्यवस्थापन अपूर्ण राहणे,गटार व सांडपाणी व्यवस्थापन निकृष्ट स्थितीत असणे, पिण्याच्या पाण्याचा नियमित पुरवठा न होणे तसेच मंजूर विकासकामे वेळेत पूर्ण न होणे यांसारख्या अडचणी शहरवासीयांना भेडसावत आहेत.
या परिस्थितीवर त्वरित तोडगा काडून दुधनी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांची स्वतंत्र व कायमस्वरूपी नियुक्ती करावी, अशी मागणी रिपब्लिकन पक्ष (आठवले)चे जिल्हा उपाध्यक्ष मा.सैदप्पा झळकी,माजी उपनगराध्यक्ष विजयकुमार मानकर,शहर अध्यक्ष गोरखनाथ धोडमनी,मुस्लिम आघाडी शहराध्यक्ष महेदिमिया जिडगे आणि संतोष जन्ना यांनी केली आहे. अन्यथा, नगरपरिषद कार्यालयावर आंदोलन करण्याचा इशारा वरील लोकांनी दिला आहे.
या निवेदनाची प्रती जिल्हा प्रशासन अधिकारी तसेच केंद्रीय राज्यमंत्री मा.ना.रामदास आठवले यांना माहीतीसाठी पाठवण्यात आली आहे.
Discussion about this post