येवला तालुका प्रतिनिधी
गोकुळ वाघ 9552167998
राजापूर: येवला तालुक्यातील राजापूर येथील कोळगांव-राजापुर या दोन गावांना जोडणाऱा रस्ता हा पूर्वी पासूनच खराब व खड्ड्याच्या मातीच्या विळख्यात सापडलेलाआहे.राजापुर पासून येवला-नांदगांव राज्यमार्गापासुन राजापूर -कोळगांव व अंदरसुल , सायगाव व अनेक गावांना जोडणाऱा रस्ता असुन कायम अनेक वर्षांपासून हा रस्ता दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. हा रस्ता ५ किलोमीटरचा असुन काही ठिकाणी १ किलो मीटर तर काही ठिकाणी अर्धा किलोमीटर रस्ता झाला असुन तो ही खराब दर्जाचा करण्यात आलेला होता.
आता मात्र पावसाळ्यात चिखल व मोठमोठाले खड्डे पडले असून कधी खड्यातुन तर कधी खड्डे व दगडे चुकवून वाहने चालवावी लागतात.राजापुर हे गाव मध्यवर्ती ठिकाणी असल्याने अनेक आज-बाजुचे गावचे लोक हे कामानिमित्त ये जा करत असतात. त्याच प्रकारे कोळगाव येथील वस्तावरील लोक तसेच राजापूर येथील वस्ती,व मळ्यातील लोकाची या रस्ताला नेहमीच वर्दळ असते.पण हा रस्ता नेहमीच दुरस्ती व डांबरीकरण करण्याच्या प्रतिक्षेत अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत.
कोळगाव -राजापुर हा दोन गावांना जोडणारा रस्ता हा शेकडो वर्षांपासून कायम नादुरुस्त आहे.हा रस्ता अंदरसुल सायगाव व इतर गावांचे अंतर कमी करण्यासाठी या रस्ताचा उपयोगी ठरतो ,पण खराब असल्याने दुसर्या पर्यायी मार्गाची वापर करावा लागतो. तसेच पन्हाळसाठे-ममदापुर हा शिव रस्ताही करावा म्हणजेच नागरीकाना येण्या जाण्याचा त्रास कमी होईल.
अशोक अलगट
ग्रामस्थ राजापूर




