एक काळ होता पारतंत्र्याचा. त्या काळात अनेक स्वातंत्र्य सैनिक तयार झाले आणि देशासाठी प्राणाची आहुती देण्यास पण पुढे सरसावले.
किती निस्सीम देशभक्ती होती आपल बलिदान सुध्दा वाया जाणार नाही याची प्रत्येक सैनिकाच्या मनात खात्री होती . तोच प्रसंग आज या सकल धनगर समाजाच्या उपोषणा वरुन हा प्रसंग आठवतो.
आज प्रत्येक जण म्हणतो मी धनगर आरक्षण अंमलवजावणी करीता उपोषण करण्या करिता बसतो जेथे ५ लोक पाहिजे तेथे ५०० च्या संख्येने समाज बांधव तयार होत आहेत . हा खरा जागृतीचा परिणाम गेल्या दशका पासून सुरु आहे. तो झिरपत झिरपत तळागाळापर्यंत पोहचला …
समाज बांधवानी अशीच एकी कायम ठेवून आपल अंतिम धैर्य काय आहे त्या लक्षावरुन विचलित न होता हि लढाई सुरु ठेवावी.. मग त्या मध्ये कितीही संकटाच्या लाटा येत राहतील, जात राहतील पण लक्ष गाठायच म्हणजे गाठायच! या साठी लाखो तरुण लढ्या साठी सज्ज आहेत.
हे पाहून मन आनंदाने भरुन आले .माझ्या कडून सर्व उपोषण कर्त्या समाज बांधवाना सदिच्छा… जय मल्हार
✍️संजय गव्हाळे
आकोला..
Discussion about this post