राज्य राणी एक्सप्रेस मधील त्या ‘देवदूताने’ वाचवले सह प्रवाशाचे प्राण….
कसारा – प्रफुल्ल शेवाळे
मुबंई मधील आकाश यादव,वय-२० वर्षे तरूण दि.१२ सप्टेंबर रोजी मुंबई नाशिक राज्यराणी एक्सप्रेसने नाशिक दिशेने प्रवास करीत होता.. राज्यराणी एक्सप्रेसने आसनगांव स्थानक सोडल्यानंतर सदर तरूणाच्या छातीत जोराने दुखू लागले.. आणि यामुळे आकाश एक्सप्रेस च्या दरवाजात पडून तळमळत होता, त्याला असह्य वेदना होत होत्या.यावेळी सदर गाडीतून रेल्वे प्रवासी मित्र आणि रेल्वे प्रवासी संघटनेचे माजी पदाधिकारी मिलिंद घायवट देखील प्रवास करीत होते.
मिलिंद यांनी गाडी कसारा स्थानकात येण्यापूर्वी कल्याण कसारा रेल्वे पॅसेंजर असोसिएशन अध्यक्ष शैलेश राऊत यांना सदर घटनेची माहिती दिली. शैलेश राऊत यांनी कसारा स्थानकाजवळ एका खाजगी गाडीची सोय केली आणि तात्काळ आकाश यादव या प्रवाशाला जीआरपी च्या मदतीने कसारा स्थानकात उतरवून कसारा सरकारी रूग्णालयात दाखल केले.रुग्णालयातील डाॅक्टरांनी आकाश वर तात्काळ उपचार केले.
आकाश ला जर आणखीन अर्धा पाऊण तास वैद्यकीय मदत मिळाली नसती तर आकाश ची परिस्थिती आणखीन बिकट झाली असती..परंतु मिलिंद घायवट आणि शैलेश राऊत यांच्या अनमोल मदतीने आकाश चे प्राण वाचले..आकाश च्या नातेवाईकांना मुंबई हुन कसारा येथे बोलावून घेतले आणि आकाश ला दि.१3 सप्टेंबर ला रुग्णालय मधून घरी जाऊ देण्यात आले.
आकाश ची तब्येत आता स्थिर आहे.आकाश यादव या प्रवाशाला तात्काळ मदत मिळवून देऊन त्याचे प्राण वाचविणारे मिलिंद घायवट या सह प्रवासाचे चे परिसरातून अभिनंदन आणि कौतुक होत आहे. मिलिंद घायवट रुपी देवदूतच त्या गाडीतून प्रवास करित होता असंच म्हणावं लागेल…
Discussion about this post