जत – प्रतिनिधी प्रा. अरूण कोळी, दि.15
जत नगरपालिका निवडणुकीत वरकरणी शांतता दिसत असली तरी पडद्यामागील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अवघे दोन दिवस उरलेले असताना प्रमुख राजकीय पक्षांनी अद्याप अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. या शांततेमागे बंडखोरीची भीती दडलेली असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
◾ पुढील 48 तासांत उलथापालथ निश्चित
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत जवळ येत असल्याने जत राजकारणात मोठ्या प्रमाणावर धावपळ, चर्चासत्रे आणि अनपेक्षित वळणे दिसण्याची शक्यता अधिक आहे.
सर्वांचे नजर आता अंतिम दोन दिवसांत जाहीर होणाऱ्या अधिकृत याद्यांवर खिळल्या आहेत.




