बाळासाहेबांनी आपल्या ठाकरी बाण्याने आणि मुक्तहस्ते विरोधकांवर शब्दांचा मारा केला. त्यांच्या व्यंगचित्रांनी अनेकांना घायाळ केलं. पण आयुष्यभर त्यांनी राजकारणापलीकडे निःस्वार्थपणे मैत्री जपली; त्यात कटुता आणली नाही. महाराष्ट्राचा इतिहास ज्यांच्या उल्लेखाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, असे राज्याच्या समाजकारणात मोठे योगदान देणारे शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन!