सारथी महाराष्ट्राचा न्यूज
रविवार दि २८ डिसेंबर २५ नरेश गें कनोजे
खापरखेडा परिसरातील सावकाराच्या कर्जामुळे त्रस्त असलेल्या एका खाजगी सुरक्षा कंपनीत काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकाने घरी आत्महत्या केल्याची घटना उदयास आली मृताचे नाव अमोल बापुराव कळंबे वय (३५) असे होते, तो रेल्वे चौकी वॉर्ड क्रमांक ३ येथील रहिवासी होता. तो सेंट्रल डिटेक्टिव्ह सिक्युरिटी सर्व्हिस कंपनी अंतर्गत येणाऱ्या ५०० मेगावॅटच्या खापरखेडा औष्णिक वीज केंद्रात सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. तो विवाहित होता आणि त्याला एक मुलगा होता. त्याने सावकारांकडून कर्ज घेतले होते तसेच कर्जाचा मानसिक तणाव आणि त्याला दारूचेही व्यसन होते. गेल्या तीन महिन्यांपासून तो ड्युटीवरून गैरहजर होता, त्यामुळे घरी वारंवार भांडणे होत होती, अशी माहिती मिळाली. शनिवारी अमोलने काही मित्रांकडे दारू खरेदी करण्यासाठी पैसे मागितले होते. या घटनेदरम्यान त्याने आपल्या घरातच पंख्याला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. खापरखेडा पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. त्यांनी घटनास्थळी पंचनामा केला, अपघाती मृत्यूची नोंद केली आणि पुढील तपास सुरू केला.



