कन्नड प्रतिनिधी : कृष्णा करंगळे
अतिवृष्टीनंतर आता जंगली प्राण्यांचा कहर; कन्नड तालुक्यातील डोंगराळ भागातील शेतकरी हवालदिल कन्नड तालुक्यातील डोंगराळ भागातील शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडले आहेत.
भिलदरी, शफीयाबाद तसेच परिसरातील गावांमध्ये जंगली प्राण्यांनी धुमाकूळ घालत पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे.
यंदा अतिवृष्टीमुळे आधीच शेतीचे नुकसान झाले असताना आता हरिण, निलगाय, रानडुक्कर आणि माकडांच्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.
सध्या गहू व हरभरा पिकांचा हंगाम सुरू असून रात्रीच्या वेळी प्राणी शेतात घुसून पिकांची नासधूस करत आहेत









