• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

भेसळवाल्यांना नोटीस देणे म्हणजे चोरांना पकडायलाही नोटीस देण्यासारखे?

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 5, 2026
in Blog
0
0
SHARES
0
VIEWS
Ad 1

उच्च न्यायालयाच्या निकालावर सामान्य नागरिकांमध्ये नाराजी

गेवराई | प्रतिनिधी :

RelatedPosts

यवतमाळ जिल्ह्यात पेरणीचा वेग वाढला; ६.५० लाख हेक्टर क्षेत्र लागवडीखाली

Ashadhi Wariपूर्वी पालखी मार्गाची दुरवस्था; भाविकांकडून प्रशासनाकडे तातडीच्या दुरुस्तीची मागणी

ग्रामपंचायत पुरजळ वार्ड क्रमांक ३ मधील मुख्य रस्त्यावर घाणीचे साम्राज्य; नागरिकांचा संताप

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या वर्धा येथील आश्रमातील ‘गोरस भंडार’ संस्थेवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) छापा टाकून तब्बल २५ लाख ८६ हजार १६८ रुपयांचा कथित भेसळयुक्त साठा जप्त केला होता. तसेच संबंधित भंडाराला सील करण्यात आले होते. या कारवाईविरोधात भंडाराच्या संचालकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली.

या प्रकरणी सुनावणीदरम्यान, कोणतीही पूर्वसूचना अथवा नोटीस न देता थेट कारवाई कशी करण्यात आली? असा सवाल उपस्थित करत न्यायालयाने अन्न व औषध प्रशासनाला फटकारले. मात्र, या निर्णयानंतर सामान्य नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

“भेसळ करणाऱ्यांना आधी नोटीस देऊन मग कारवाई करायची का? चोर पकडायलाही नोटीस द्यावी लागते का?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. महाराष्ट्रात भेसळीविरोधात प्रभावी काम करणाऱ्या विभागांमध्ये FDA अग्रस्थानी असून, अशा कारवायांना खीळ बसू नये, अशी भावना सर्वसामान्यांकडून व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वर्धा येथील ‘गोरस भंडार’ या संस्थेवर २१ मे रोजी FDA ने छापा टाकला होता. तपासणीदरम्यान अत्यंत अस्वच्छ वातावरणात दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन आणि साठवणूक सुरू असल्याचे निदर्शनास आले. तसेच दूध, तूप, ताक आणि खवा यामध्ये कथित भेसळ होत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. यानंतर मोठ्या प्रमाणावर माल जप्त करून उत्पादन केंद्र सील करण्यात आले.

दरम्यान, या कारवाईमुळे सुमारे ८०० कुटुंबांचा उदरनिर्वाह धोक्यात आल्याचा दावा याचिकाकर्त्यांकडून करण्यात आला. या कुटुंबांच्या उपजीविकेचा प्रश्न न्यायालयासमोर मांडण्यात आला. न्यायालयाने त्याची दखल घेत प्रशासनाला प्रश्न विचारले.

मात्र, दुसरीकडे सामान्य नागरिकांचे म्हणणे असे आहे की, “८०० कुटुंबांच्या रोजगाराचा प्रश्न महत्त्वाचा असला, तरी हजारो नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करण्याचा अधिकार कोणालाही नाही.” भेसळयुक्त अन्नपदार्थांमुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे अशा कारखान्यांवर कठोर कारवाई होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.

FDA ने केलेली कारवाई ही जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्यच होती, असे अनेकांचे म्हणणे असून, राज्यभरात सुरू असलेल्या भेसळ प्रकरणांवर कठोर पावले उचलण्याची मागणी आता अधिक जोर धरू लागली आहे.

Previous Post

Ashadhi Wariपूर्वी पालखी मार्गाची दुरवस्था; भाविकांकडून प्रशासनाकडे तातडीच्या दुरुस्तीची मागणी

Next Post

यवतमाळ जिल्ह्यात पेरणीचा वेग वाढला; ६.५० लाख हेक्टर क्षेत्र लागवडीखाली

Related Posts

Blog

यवतमाळ जिल्ह्यात पेरणीचा वेग वाढला; ६.५० लाख हेक्टर क्षेत्र लागवडीखाली

July 5, 2026
3
Blog

Ashadhi Wariपूर्वी पालखी मार्गाची दुरवस्था; भाविकांकडून प्रशासनाकडे तातडीच्या दुरुस्तीची मागणी

July 5, 2026
3
Blog

ग्रामपंचायत पुरजळ वार्ड क्रमांक ३ मधील मुख्य रस्त्यावर घाणीचे साम्राज्य; नागरिकांचा संताप

July 5, 2026
17
Blog

Rayat Shikshan Sansthaच्या श्रीगोंदा कन्या विद्यालयाचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश

July 5, 2026
7
Blog

श्रीगोंद्याच्या राजकारणात ऐतिहासिक वळण; ४८ वर्षांत पहिल्यांदाच पाचपुते घराण्यातील सदस्याचा जिल्हा बँकेत प्रवेशाचा प्रयत्न

July 5, 2026
3
Blog

सगळ्यांनीच पुण्यासारख्या शहरांची वाट धरली तर आपल्या गावाचा विकास कधी होणार?— निखिल नाळे

July 5, 2026
10
Next Post

यवतमाळ जिल्ह्यात पेरणीचा वेग वाढला; ६.५० लाख हेक्टर क्षेत्र लागवडीखाली

ताज्या बातम्या

यवतमाळ जिल्ह्यात पेरणीचा वेग वाढला; ६.५० लाख हेक्टर क्षेत्र लागवडीखाली

July 5, 2026

भेसळवाल्यांना नोटीस देणे म्हणजे चोरांना पकडायलाही नोटीस देण्यासारखे?

July 5, 2026

Ashadhi Wariपूर्वी पालखी मार्गाची दुरवस्था; भाविकांकडून प्रशासनाकडे तातडीच्या दुरुस्तीची मागणी

July 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In