तेल्हारा तालुक्यातील बेलखेड येथे हिंदू समाजात जागृती, एकता आणि नवचेतना निर्माण करण्याच्या उद्देशाने ‘संघटित हिंदू समर्थ भारत’ या संकल्पनेतून विराट हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे संमेलन शनिवार, दिनांक २१ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता श्री गजानन महाराज मंदिर, बेलखेड येथे पार पडणार आहे. सनातन धर्म, संस्कृती आणि सामाजिक एकतेचे प्रतीक असलेले हे संमेलन सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आले असून, समाजामध्येकरणार असून ते अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ यांचे प्रचारक धर्माभिमान, संघटन आणि स्वसंरक्षणाची भावना दृढ करण्याचा यामागील प्रमुख उद्देश आहे. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्रीधरजी टोहरे हे राहणार आहेत. संमेलनाचे प्रमुख वक्ते म्हणून ह.भ.प. श्री शुकदासजी गाडेकर महाराज हे मार्गदर्शनअसून श्री क्षेत्र गुरुकुंज आश्रम, मोझरी येथून कार्यरत आहेत. तसेच शक्ती सभा संस्थापिका कु. आर्यविरा हर्षीताजी मध्यप्रदेश या हिंदू समाजातील महिलांच्या सक्षमीकरणावर मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय सामाजिक कार्यकर्ता व स्वसंरक्षण प्रशिक्षक सुनिलजी जाधव, सह कार्यवाह, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अकोला विभाग हेही उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. या संमेलनासाठी बेलखेडसह गाडेगाव, पाथर्डी, घोडेगाव, जस्तगाव, वरुड बिहाडे, राणेगाव, भोकर आदी परिसरातील हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.








