जत: (प्रतिनिधी)
जत नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक २ आणि ३ मधील सार्वजनिक शौचालयांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, येथील नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वारंवार तक्रार करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
गंदगी आणि दुर्गंधीचे साम्राज्य
या प्रभागांतील शौचालयांची गेल्या अनेक दिवसांपासून स्वच्छता करण्यात आलेली नाही. शौचालयांचे काही भाग तुटलेले असून,येथीलमलमा टाकीलिकीज झाले पाण्याची सोय नसल्याने परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. यामुळे स्थानिक नागरिकांच्या, विशेषतः महिला आणि वृद्धांच्या व येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुलाच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पावसाळ्यात ही परिस्थिती अधिकच बिकट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
प्रशांत जाधव यांची आक्रमक भूमिका
स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते प्रशांत जाधव यांनी या प्रश्नावर प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. त्यांनी म्हटले आहे की:
“प्रभाग २ आणि ३ मधील नागरिकांनी अनेकदा तोंडी आणि लेखी तक्रारी दिल्या आहेत. स्वच्छ भारत अभियानाच्या गप्पा मारणारे प्रशासन प्रत्यक्ष जमिनीवर काय परिस्थिती आहे हे पाहायला तयार नाही. जर तातडीने दुरुस्ती आणि स्वच्छता झाली नाही, तर आम्हाला तीव्र आंदोलन छेडावे लागेल.”
नागरिकांच्या प्रमुख मागण्या:
शौचालयांची नियमित स्वच्छता करण्यात यावी.
तुटलेले बाथरूम आणि मलमा टाकीचे तातडीने दुरुस्ती व्हावी.
पाण्याची कायमस्वरूपी सोय उपलब्ध करून द्यावी.
परिसरात औषध फवारणी करून आरोग्याचा धोका टाळावा.
आता नगरपरिषद प्रशासन याकडे गांभीर्याने बघून कारवाई करणार की नागरिकांना असाच नरकयातना सोसाव्या लागणार, असा सवाल उपस्थित होत आहे.




