अंदरसुल ता येवला येथील राधिका इंग्लिश मिडीयम स्कुल मधे मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला
या प्रसंगी कवी कुसुमाग्रज यांचे प्रतीमेचे पुजन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी शाळेचे प्राचार्य डाॅ आसिफ शेख होते
दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा केला जातो, ज्याचा उद्देश मराठी भाषेचा समृद्ध वारसा, साहित्याचा गौरव करणे आणि भाषेचे संवर्धन करणे आहे महाराष्ट्र शासनाने २०१३ पासून हा दिवस अधिकृतपणे साजरा करण्यास सुरुवात केली
मराठी भाषा दिनाचे महत्त्व
हा दिवस केवळ उत्सव नसून, मराठी भाषेची समृद्ध संस्कृती, इतिहास आणि साहित्याचा गौरव करण्याचा दिवस आहे. मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा असून, तिच्या जतनासाठी आणि संवर्धनासाठी या दिवशी विशेष प्रतिज्ञा घेतली जाते. कुसुमाग्रजांचे मराठी साहित्यातील योगदान या दिवशी स्मरणात ठेवले जाते.
कार्यक्रम यशस्वि होण्यासाठी श्री अंकुश सैद,सौ दुर्गा परदेशी,सौ अश्वीनी भोसले,सौ रत्ना थोरात,श्रीमती कावरी आसने,श्रीमती सावंत मॅडम,श्रीमती श्रध्दा नारायने मॅडम,सौ घोसाळकर मॅडम,सौ शितल ढोमसे,श्री रुषीकेश टुपके,श्री आवारे सर,श्री महेश भोसले सर,श्री जीवन मोरे यांनी परीश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सुञ संचालन सौ कावेरी जेजुरकर यांनी केले








