• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

परभणी जिल्ह्यात चार दिवस येलो अलर्ट; उष्मालाट व पावसाचा इशारा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 18, 2026
in Blog
0
0
SHARES
2
VIEWS
Ad 1

उष्मालाटेत जनतेने विशेष काळजी घ्यावी – जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

RelatedPosts

भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त जालना शहर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघणार

अक्षयतृतीयेला बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन सतर्क

येणारा काळ अविवाहितेचे युग ठरणार आहे का…?

परभणी , दि. 17 (जिमाका) : प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार परभणी जिल्ह्यासाठी दि. १७, १८, १९ व २० एप्रिल २०२६ या चार दिवसांकरीता येलो अलर्ट जारी केला आहे.

दि. १७ एप्रिल रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्मालाट येण्याची अधिक शक्यता वर्तविण्यात आली आहे, तर दि. १८ एप्रिल रोजीही उष्मालाट राहण्याची शक्यता आहे. दि. १९ व २० एप्रिल रोजी जिल्ह्यात ताशी ३० ते ४० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता वर्तविली आहे.

जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी. दुपारी अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी पिणे, डोक्यावर टोपी/ओढणी वापरणे आणि हलके, सैल कपडे परिधान करावेत. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला आणि आजारी व्यक्तींनी विशेष दक्षता घ्यावी. उष्माघाताची लक्षणे जाणवल्यास तात्काळ जवळच्या आरोग्य केंद्रात संपर्क साधावा. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले आहे.

उष्मालाट काळातील घ्यावयाची काळजी

काय करावे :–
तहान नसली तरी पुरेसे पाणी प्या. गंभीर आजार असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच द्रवपदार्थ घ्यावेत.
ओआरएस, लिंबूपाणी, ताक, लस्सी, कैरीचे पन्हे, नारळपाणी यांसारखे द्रवपदार्थ घ्या. हलक्या रंगाचे, सैल व सुती कपडे परिधान करा. दुपारी १२ ते ३ या वेळेत बाहेर जाणे टाळा. बाहेर जाताना डोके झाका, टोपी/छत्री वापरा, गॉगल व सनस्क्रीनचा वापर करा. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व आजारी व्यक्तींची विशेष काळजी घ्या. प्रवासात पिण्याचे पाणी सोबत ठेवा. अशक्तपणा, चक्कर, डोकेदुखी जाणवल्यास तात्काळ वैद्यकीय सल्ला घ्या. घर थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर, सनशेडचा वापर करा. पशुधन सावलीत ठेवा व पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्या.

काय टाळावे :-
दुपारी उन्हात बाहेर जाणे व कष्टाची कामे करणे टाळा. अनवाणी बाहेर जाऊ नका. अतिउष्णतेच्या काळात स्वयंपाक टाळा. मद्यपान, चहा, कॉफी, शीतपेये टाळा. जास्त तेलकट, तिखट, मिठाचे व शिळे अन्न खाऊ नका. वाहनात लहान मुले किंवा प्राणी बंद करून ठेवू नका. गडद व जाड कपडे परिधान करणे टाळा. तापमान जास्त असल्यास शारीरिक श्रम टाळा. नागरिकांनी या सूचनांचे पालन करून स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्यावी, असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षा अनुराधा ढालकरी यांनी कळविले आहे.
–––-*

Previous Post

हकरमध्ये ACBची मोठी कारवाई महसूल अधिकारी २० हजारांची लाच घेताना पकडला

Next Post

अक्षयतृतीयेला बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन सतर्क

Related Posts

Blog

भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त जालना शहर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघणार

April 18, 2026
0
Blog

अक्षयतृतीयेला बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन सतर्क

April 18, 2026
12
Blog

येणारा काळ अविवाहितेचे युग ठरणार आहे का…?

April 17, 2026
7
विधान परिषदेच्या रिक्त जागासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर, 9 जागांसह एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार
Blog

विधान परिषदेच्या रिक्त जागासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर, 9 जागांसह एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार

April 17, 2026
36
📰 कल्याण पूर्वच्या मूलभूत प्रश्नांवर आयुक्तांसोबत सविस्तर चर्चा
Blog

📰 कल्याण पूर्वच्या मूलभूत प्रश्नांवर आयुक्तांसोबत सविस्तर चर्चा

April 17, 2026
4
पनवेलमध्ये ‘नारीशक्ती वंदन अधिनियम’ समर्थनार्थ भाजप च्या वतीने भव्य पदयात्रेचे आयोजन
Blog

पनवेलमध्ये ‘नारीशक्ती वंदन अधिनियम’ समर्थनार्थ भाजप च्या वतीने भव्य पदयात्रेचे आयोजन

April 17, 2026
11
Next Post

अक्षयतृतीयेला बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन सतर्क

ताज्या बातम्या

तळेरे आरोग्य उपकेंद्राला ग्रामपंचायतीकडून वॉटर फिल्टर भेट; रुग्णांना मिळणार थंड व स्वच्छ पाण्याचा आधार

तळेरे आरोग्य उपकेंद्राला ग्रामपंचायतीकडून वॉटर फिल्टर भेट; रुग्णांना मिळणार थंड व स्वच्छ पाण्याचा आधार

April 18, 2026
श्रीक्षेत्र माहूरगडच्या विकासाला गती, ८२९ कोटींच्या कामांना लवकरच मंजुरी. पालकमंत्री अतुल सावे

श्रीक्षेत्र माहूरगडच्या विकासाला गती, ८२९ कोटींच्या कामांना लवकरच मंजुरी. पालकमंत्री अतुल सावे

April 18, 2026

भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त जालना शहर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघणार

April 18, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In