• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अक्षयतृतीयेला बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन सतर्क

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 18, 2026
in Blog
0
0
SHARES
25
VIEWS
Ad 1

“नियम “मोडल्यास कडक कारवाईचा इशारा शासनाने दिला आहे”.

RelatedPosts

शिक्षणाला प्रोत्साहन; नगराध्यक्ष फरीन बेगम यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

चांभुर्डी येथे ५ जूनपासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन; १२ जूनला काल्याच्या कीर्तनाने सांगता

चांभुर्डी येथील जि.प. शाळेत ब्रिटानिया डेअरी व सर नेस वाडिया फाउंडेशनतर्फे ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ प्रकल्प साकार

परभणी प्रतिनिधी :- रमेश मुलगीर

परभणी : अक्षयतृतीयेचा मुहूर्त अत्यंत शुभ मानला जात असला तरी या दिवशी हुंडा मागणीने बालविवाह होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने सतर्कता वाढविली आहे. ग्रामीण व शहरी भागात १९ एप्रिल रोजी होणाऱ्या विवाह सोहळ्यांमध्ये बालविवाह होऊ नये, यासाठी विशेष दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कैलास त्र्यंबकराव तिडके यांनी केले आहे.
भारतीय कायद्यानुसार मुलाचे किमान वय २१ वर्षे आणि मुलीचे १८ वर्षे पूर्ण असणे बंधनकारक आहे. यापेक्षा कमी वयात विवाह केल्यास तो बालविवाह प्रतिबंधक कायदा २००६ अंतर्गत बेकायदेशीर ठरतो. या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामीण भागात ग्रामसेवक तर शहरी भागात बालविकास प्रकल्प अधिकारी यांची बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
गावपातळीवर सरपंच, पोलीस पाटील आणि अंगणवाडी सेविका यांनी विवाहपूर्व वधू-वरांचे वय तपासून खात्री करावी, असे स्पष्ट निर्देश प्रशासनाने दिले आहेत. बालविवाह लावणे हा दखलपात्र गुन्हा असून केवळ पालकच नव्हे तर विवाह सोहळ्यात सहभागी होणारे वराडी, भटजी, बँडवाले, मंगल कार्यालय चालक तसेच विवाहात मदत करणाऱ्यांवरही कारवाई केली जाऊ शकते.


अधिनियम २००६ अंतर्गत दोषी आढळल्यास दोन वर्षांपर्यंत सश्रम कारावास आणि ५ लाख रुपयांपर्यंत दंडाची शिक्षा होऊ शकते. गावात किंवा परिसरात बालविवाह होत असल्याची माहिती मिळाल्यास तात्काळ चाइल्ड हेल्पलाईन १०९८ किंवा पोलीस विभागाच्या ११२ या टोल फ्री क्रमांकावर कळवावी. माहिती देणाऱ्यांची ओळख गोपनीय ठेवली जाईल, असे प्रशासनाने सांगितले आहे.
जिल्हा बालविवाहमुक्त करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असून, संशयास्पद विवाहांची माहिती तत्काळ देऊन नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Previous Post

परभणी जिल्ह्यात चार दिवस येलो अलर्ट; उष्मालाट व पावसाचा इशारा

Next Post

🚧 अर्धवट रस्त्यामुळे अपघातांची मालिका; नागरिकांमध्ये संताप

Related Posts

शिक्षणाला प्रोत्साहन; नगराध्यक्ष फरीन बेगम यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
Blog

शिक्षणाला प्रोत्साहन; नगराध्यक्ष फरीन बेगम यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

June 3, 2026
15
चांभुर्डी येथे ५ जूनपासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन; १२ जूनला काल्याच्या कीर्तनाने सांगता
Blog

चांभुर्डी येथे ५ जूनपासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन; १२ जूनला काल्याच्या कीर्तनाने सांगता

June 2, 2026
32
चांभुर्डी येथील जि.प. शाळेत ब्रिटानिया डेअरी व सर नेस वाडिया फाउंडेशनतर्फे ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ प्रकल्प साकार
Blog

चांभुर्डी येथील जि.प. शाळेत ब्रिटानिया डेअरी व सर नेस वाडिया फाउंडेशनतर्फे ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ प्रकल्प साकार

June 2, 2026
30
उस्मानाबाद जिल्हा खाजगी शिक्षण संस्था चालक संघटनेची बैठक संपन्न
Blog

उस्मानाबाद जिल्हा खाजगी शिक्षण संस्था चालक संघटनेची बैठक संपन्न

June 2, 2026
9
भाजपमधील नाराजीचा फायदा महेश देशमुख यांना होणार का?
Blog

भाजपमधील नाराजीचा फायदा महेश देशमुख यांना होणार का?

June 2, 2026
11
नादगाव (मुरुड-जंजिरा) येथे अवकाळी पावसाची हजेरी; नागरिकांची धावपळ
ताज्या घडामोडी

नादगाव (मुरुड-जंजिरा) येथे अवकाळी पावसाची हजेरी; नागरिकांची धावपळ

June 2, 2026
2
Next Post
🚧 अर्धवट रस्त्यामुळे अपघातांची मालिका; नागरिकांमध्ये संताप

🚧 अर्धवट रस्त्यामुळे अपघातांची मालिका; नागरिकांमध्ये संताप

ताज्या बातम्या

शिक्षणाला प्रोत्साहन; नगराध्यक्ष फरीन बेगम यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

शिक्षणाला प्रोत्साहन; नगराध्यक्ष फरीन बेगम यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

June 3, 2026
महागाईविरोधात काँग्रेसचे आंदोलन; शेतकरी व सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर सरकारला धारेवर

महागाईविरोधात काँग्रेसचे आंदोलन; शेतकरी व सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर सरकारला धारेवर

June 2, 2026
एमआरपीच्या नावाखाली ग्राहकांची लूट थांबवा; अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

एमआरपीच्या नावाखाली ग्राहकांची लूट थांबवा; अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

June 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In