• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

राज्यस्तरीय आदर्श महाराष्ट्र गौरव पुरस्काराने समाजसेवक तथा युवा पत्रकार संजय चव्हाण यांचा गौरव

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 19, 2026
in Blog
0
0
SHARES
15
VIEWS
Ad 1

पुणे | प्रतिनिधी

समाजसेवा आणि पत्रकारितेच्या माध्यमातून लोकहिताचे कार्य करणारे समाजसेवक तथा युवा पत्रकार संजय केळाबाई रामचंद्र चव्हाण यांना “राज्यस्तरीय आदर्श महाराष्ट्र गौरव पुरस्कार – २०२६” प्रदान करून सन्मानित करण्यात आले. समाजहित, जनजागृती आणि सामाजिक बांधिलकीची दखल घेत त्यांना हा राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात आला.

RelatedPosts

पिवंदळ बु. येथे मजुरांची तीव्र टंचाई; शेतीकामे रखडल्याने शेतकरी चिंतेत

वान धरणाच्या पाण्याच्या प्रतीक्षेत ग्रामस्थ; पिण्याच्या पाण्यासाठी तीन किलोमीटरची पायपीट

करमाळा तालुक्यात संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे उत्साहात स्वागत; तहसीलदार शिल्पा ठोकडे वारकऱ्यांसोबत पायी सहभागी

पुण्यात विजेता मीडिया यांच्या वतीने आयोजित “आदर्श गौरव सन्मान सोहळा – २०२६” मध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. समाजाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा यावेळी गौरव करण्यात आला.

संजय चव्हाण हे जुन्नर तालुक्यात विशेषतः बंजारा समाज तसेच भटक्या-विमुक्त समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि विकासाशी संबंधित प्रश्नांवर सातत्याने कार्यरत आहेत. शासकीय योजनांची माहिती वंचित घटकांपर्यंत पोहोचवणे, त्यांच्या समस्या प्रशासनासमोर मांडणे आणि न्याय मिळवून देण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत.

यासोबतच त्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातूनही लोकहिताचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्यास सुरुवात केली असून, समाजसेवा आणि पत्रकारिता या दोन्ही क्षेत्रांतून जनतेच्या हितासाठी कार्य करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर संजय चव्हाण म्हणाले, “हा पुरस्कार माझ्यासाठी प्रेरणादायी असून, समाजातील वंचित, गरजू आणि दुर्लक्षित घटकांसाठी अधिक जोमाने कार्य करण्याची जबाबदारी वाढवणारा आहे. भविष्यातही समाजसेवा आणि पत्रकारितेच्या माध्यमातून लोकहितासाठी प्रामाणिकपणे कार्य करत राहीन.”

या राज्यस्तरीय सन्मानाबद्दल त्यांच्यावर विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, मित्रपरिवार आणि नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील सामाजिक आणि पत्रकारितेच्या वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.

Previous Post

घरकुल निधीच्या कथित गैरव्यवहाराला न्यायालयाचा दणका; माहूरच्या तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Next Post

इंद्रायणीच्या महापुराचा ‘श्री गोविंद महाराज केंद्र संस्थेला’ मोठा फटका; लाखो रुपयांचे नुकसान, तातडीच्या मदतीची मागणी

Related Posts

Blog

पिवंदळ बु. येथे मजुरांची तीव्र टंचाई; शेतीकामे रखडल्याने शेतकरी चिंतेत

July 19, 2026
0
Blog

वान धरणाच्या पाण्याच्या प्रतीक्षेत ग्रामस्थ; पिण्याच्या पाण्यासाठी तीन किलोमीटरची पायपीट

July 19, 2026
0
करमाळा तालुक्यात संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे उत्साहात स्वागत; तहसीलदार शिल्पा ठोकडे वारकऱ्यांसोबत पायी सहभागी
Blog

करमाळा तालुक्यात संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे उत्साहात स्वागत; तहसीलदार शिल्पा ठोकडे वारकऱ्यांसोबत पायी सहभागी

July 19, 2026
3
Blog

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, कळंब तालुका अध्यक्षपदी अमर चोंदे यांची बिनविरोध निवड

July 19, 2026
6
Blog

जात पडताळणी समितीला ‘टाळे ठोक’ आंदोलनाचा इशारा; महादेव कोळी समाजाच्या बैठकीत निर्धार

July 19, 2026
25
Blog

आळंदीकरांनो सतर्क राहा! पिण्याचे पाणी उकळून व गाळूनच वापरा; नगरपरिषदेचे महत्त्वाचे आवाहन

July 19, 2026
15
Next Post

इंद्रायणीच्या महापुराचा ‘श्री गोविंद महाराज केंद्र संस्थेला’ मोठा फटका; लाखो रुपयांचे नुकसान, तातडीच्या मदतीची मागणी

ताज्या बातम्या

पिवंदळ बु. येथे मजुरांची तीव्र टंचाई; शेतीकामे रखडल्याने शेतकरी चिंतेत

July 19, 2026

वान धरणाच्या पाण्याच्या प्रतीक्षेत ग्रामस्थ; पिण्याच्या पाण्यासाठी तीन किलोमीटरची पायपीट

July 19, 2026
करमाळा तालुक्यात संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे उत्साहात स्वागत; तहसीलदार शिल्पा ठोकडे वारकऱ्यांसोबत पायी सहभागी

करमाळा तालुक्यात संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे उत्साहात स्वागत; तहसीलदार शिल्पा ठोकडे वारकऱ्यांसोबत पायी सहभागी

July 19, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In