सेलू जी परभणी प्रतिनिधि.
आदित्य लताड
शहरातील किराणा महागाईने सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले!
शहरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या किराणा दरांमुळे सामान्य कुटुंबांचे महिन्याचे बजेट पूर्णपणे बिघडले आहे. तेल, डाळी, साखर, तांदूळ, गहू, मसाले तसेच रोजच्या वापरातील वस्तूंच्या किंमती सतत वाढत असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पूर्वी हजार रुपयांत भरून येणारी किराण्याची पिशवी आता अर्धीही भरत नसल्याची प्रतिक्रिया अनेक गृहिणींनी व्यक्त केली आहे. वाढती महागाई, गॅस सिलेंडरचे वाढलेले दर आणि त्यातच किराणा सामानाच्या किंमतींनी सामान्य माणसाचे जगणे कठीण केले आहे.
कामगार, शेतकरी,
छोटे व्यापारी आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना सर्वाधिक फटका बसत असून “पगार तेवढाच पण खर्च दुप्पट” अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. काही नागरिकांनी सरकारने महागाई नियंत्रणासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे.
दरम्यान, किरकोळ विक्रेत्यांचे म्हणणे आहे की बाजारातील वाढते होलसेल दर, वाहतूक खर्च आणि इंधन दरवाढ यामुळे किराणा वस्तू महाग होत आहेत.
सामान्य माणूस महागाईच्या विळख्यात अडकला असून आता तरी सरकारने लक्ष द्यावे, अशी भावना शहरातील नागरिक व्यक्त करत आहेत.




