महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन दिनांक २२ जून २०२६ पासून मुंबई येथे सुरू होत आहे.
आपल्या गावातील अथवा परिसरातील रस्ते, पाणीपुरवठा, वीज, शिक्षण, आरोग्य, शेती, रोजगार, सार्वजनिक सुविधा तसेच इतर कोणत्याही जनहिताच्या समस्या, सूचना किंवा मागण्या व्हॉट्सअॅप, ई-मेल किंवा लेखी स्वरूपात कळवाव्यात, ही नम्र विनंती.
आपण पाठविलेल्या विषयांचा सखोल अभ्यास करून जनहिताशी संबंधित महत्त्वाचे प्रश्न विधिमंडळात प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न राहील. नागरिकांच्या समस्या शासनापर्यंत पोहोचून त्यावर योग्य कार्यवाही व्हावी, यासाठी आपला सहभाग आणि सहकार्य अपेक्षित आहे.







