भगवान बुद्धांच्या विचारांचा प्रसार काळाची गरज; कीष्टापूर टोला येथे पंचशील बुद्ध विहाराचे लोकार्पण
गडचिरोली/चामोर्शी, दि. ७ जून
“मानवतेचा, शांततेचा आणि समतेचा संदेश देणाऱ्या भगवान गौतम बुद्धांच्या विचारांची आज देशाला अधिक आवश्यकता आहे. समाजात सौहार्द, बंधुता आणि शांतता टिकवून ठेवण्यासाठी बुद्धांचे विचार प्रत्येकापर्यंत पोहोचले पाहिजेत. देशाला युद्धाची नाही, तर बुद्धाची गरज आहे,” असे प्रतिपादन काँग्रेस विधिमंडळ गटनेते Vijay Wadettiwar यांनी केले.
चामोर्शी तालुक्यातील कीष्टापूर टोला (येनापूर) येथे पंचशील बौद्ध समाज मंडळ व सावित्रीबाई फुले महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पंचशील बुद्ध विहार लोकार्पण व भगवान गौतम बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यात ते उद्घाटक म्हणून बोलत होते.
या कार्यक्रमात भगवान बुद्धांच्या विचारांवर आधारित सामाजिक परिवर्तन, मानवता आणि समतेचा संदेश देण्यात आला. यावेळी Adv. Vishwajit Marotrao Kovase यांनी आपल्या भाषणात Dr. B. R. Ambedkar यांच्या समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाच्या विचारांचा प्रसार घराघरात होणे आवश्यक असल्याचे सांगितले. समाजातील सर्व घटकांनी शिक्षण, संघटन आणि संघर्षाच्या माध्यमातून प्रगतीचा मार्ग स्वीकारावा, असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद सदस्य ॲड. राम मेश्राम, प्रदेश सचिव अजय कंकडालवार, माजी नगरसेवक बंडू शनिवारे, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष निकेश गद्देवार, अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, माजी प्राचार्य जयंत येलमुले गोंगले, निनाद देठेकर, युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रमोद उमरे, तालुकाध्यक्ष प्रेमानंद गोंगले, सचिव राकेश कुरखेडे, उपाध्यक्ष भीमराव रामटेके यांच्यासह परिसरातील बौद्ध बांधव, महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पंचशील बुद्ध विहाराच्या लोकार्पणामुळे परिसरातील बौद्ध समाजाला धार्मिक व सामाजिक उपक्रमांसाठी एक नवे केंद्र उपलब्ध झाले असून, भगवान बुद्धांचे विचार समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी हे विहार प्रेरणास्थान ठरेल, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.










