• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

निर्गुणा धरणाचे पाणी कॅनॉलद्वारे सोडण्याबाबत पाटबंधारे विभागाला निवेदन; सामाजिक कार्यकर्ते निलेश कापकर यांची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 11, 2026
in Blog
0
निर्गुणा धरणाचे पाणी कॅनॉलद्वारे सोडण्याबाबत पाटबंधारे विभागाला निवेदन; सामाजिक कार्यकर्ते निलेश कापकर यांची मागणी
0
SHARES
29
VIEWS
Ad 1

पातूर | प्रतिनिधी

पातूर तालुक्यातील आलेगाव व परिसरातील गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते निलेश तोताराम कापकर यांनी चोंढी येथील निर्गुणा धरणाचे पाणी कॅनॉलद्वारे सोडण्याची मागणी करत पाटबंधारे विभागाला निवेदन सादर केले आहे.

RelatedPosts

कडक उन्हामुळे विदर्भातील शाळांना मुदतवाढ; आता २२ जूनपासून होणार शाळा सुरू

पुरुषोत्तमपुरी येथील गोदावरी नदीतील बोट दुर्घटनेत दोन महिला भाविकांचा मृत्यू

बँकॉकच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत युवा शास्त्रज्ञ रणजित राऊत यांचा दुहेरी सन्मान

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, पातूर तालुक्यातील चोंढी येथे असलेल्या निर्गुणा धरण मध्ये सध्या मुबलक प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध आहे. मात्र आलेगावसह परिसरातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. बहुतांश विहिरी, बोअरवेल आणि इतर जलस्रोत कोरडे पडल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे परिस्थिती अधिक गंभीर बनली असून, केवळ नागरिकच नव्हे तर पाळीव जनावरे आणि रानटी प्राण्यांनाही पिण्याच्या पाण्याचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे पशुधन आणि वन्यजीवांचेही हाल होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

निर्गुणा धरणातील उपलब्ध पाणी कॅनॉलद्वारे सोडल्यास आलेगाव व परिसरातील गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटू शकतो. तसेच भूजल पातळीत वाढ होऊन विहिरी आणि बोअरवेलना पुन्हा पाणी उपलब्ध होण्यास मदत होईल. यामुळे नागरिकांसह शेतकरी आणि पशुपालकांनाही मोठा दिलासा मिळणार असल्याचे निलेश कापकर यांनी म्हटले आहे.

या गंभीर परिस्थितीची तात्काळ दखल घेऊन पाटबंधारे विभागाने निर्गुणा धरणाचे पाणी कॅनॉलद्वारे सोडण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

परिसरातील वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने या मागणीचा सकारात्मक विचार करून लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

Previous Post

जनतेच्या दारी प्रशासन; पाचोऱ्यात जनसमाधान बैठकीत नागरिकांना थेट संवादाची संधी

Next Post

रुग्ण हक्क परिषद महाराष्ट्र प्रदेशतर्फे पद्मश्री रघुवीर खेडकर यांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न

Related Posts

Blog

कडक उन्हामुळे विदर्भातील शाळांना मुदतवाढ; आता २२ जूनपासून होणार शाळा सुरू

June 11, 2026
0
पुरुषोत्तमपुरी येथील गोदावरी नदीतील बोट दुर्घटनेत दोन महिला भाविकांचा मृत्यू
Blog

पुरुषोत्तमपुरी येथील गोदावरी नदीतील बोट दुर्घटनेत दोन महिला भाविकांचा मृत्यू

June 11, 2026
3
बँकॉकच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत युवा शास्त्रज्ञ रणजित राऊत यांचा दुहेरी सन्मान
Blog

बँकॉकच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत युवा शास्त्रज्ञ रणजित राऊत यांचा दुहेरी सन्मान

June 11, 2026
2
धुळे विभागाकडून शहादा आगाराची कायमची उपेक्षा? प्रवाशांचा संतप्त सवाल; लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह
Blog

धुळे विभागाकडून शहादा आगाराची कायमची उपेक्षा? प्रवाशांचा संतप्त सवाल; लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह

June 11, 2026
5
महात्मा गांधी गृहनिर्माण सोसायटीच्या विशेष सर्वसाधारण सभेत सर्व विषयांना एकमताने मंजुरी
Blog

महात्मा गांधी गृहनिर्माण सोसायटीच्या विशेष सर्वसाधारण सभेत सर्व विषयांना एकमताने मंजुरी

June 11, 2026
1
वयोश्री योजनेतून १,६५३ ज्येष्ठ लाभार्थ्यांना मोफत सहाय्यक साधनांचे वितरण
Blog

वयोश्री योजनेतून १,६५३ ज्येष्ठ लाभार्थ्यांना मोफत सहाय्यक साधनांचे वितरण

June 11, 2026
4
Next Post
रुग्ण हक्क परिषद महाराष्ट्र प्रदेशतर्फे पद्मश्री रघुवीर खेडकर यांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न

रुग्ण हक्क परिषद महाराष्ट्र प्रदेशतर्फे पद्मश्री रघुवीर खेडकर यांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न

ताज्या बातम्या

कडक उन्हामुळे विदर्भातील शाळांना मुदतवाढ; आता २२ जूनपासून होणार शाळा सुरू

June 11, 2026
पुरुषोत्तमपुरी येथील गोदावरी नदीतील बोट दुर्घटनेत दोन महिला भाविकांचा मृत्यू

पुरुषोत्तमपुरी येथील गोदावरी नदीतील बोट दुर्घटनेत दोन महिला भाविकांचा मृत्यू

June 11, 2026
कोयना नदीत बुडून १२ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

कोयना नदीत बुडून १२ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

June 11, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In