कन्नड प्रतिनिधी :
विठ्ठलपूर येथील गट क्रमांक ७१ मधील वनविभागाच्या जमिनीवर सन १९७० पासून शेती करत असलेल्या एका आदिवासी कुटुंबाला वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून त्रास दिल्याची माहिती समोर आल्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित कुटुंबाची प्रत्यक्ष भेट घेतली.
यावेळी पदाधिकाऱ्यांनी कुटुंबीयांना धीर देत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून या प्रकरणी जाब विचारला. चर्चेदरम्यान संबंधित कुटुंबाला यापुढे कोणताही त्रास दिला जाणार नसल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी मान्य केल्याची माहिती देण्यात आली.
या भेटीदरम्यान वंचित बहुजन आघाडी चे जिल्हाध्यक्ष रुपचंद गाडेकर, जिल्हा संघटक राजन किर्तने, जिल्हा उपाध्यक्ष साहेबराव चौतमल, कन्नड तालुकाध्यक्ष सुनील शिरसाठ, तालुका उपाध्यक्ष धम्मपाल पैटणे तसेच संबंधित अतिक्रमणधारक उपस्थित होते.
आदिवासी कुटुंबांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी कटिबद्ध असून अन्यायाविरोधात आवाज उठवत राहणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.
