तेल्हारा प्रतिनिधी
पिवंदळ बु. परिसरात झालेल्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून खरीप हंगामातील पेरणीच्या कामांना वेग आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून समाधानकारक पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळाला आहे. पेरणीयोग्य पाऊस झाल्याने शेतकरी मोठ्या उत्साहात शेतात उतरले असून सोयाबीन, तूर, कापूस आदी पिकांच्या पेरणीची लगबग सुरू झाली आहे.
परिसरातील शेतांमध्ये ट्रॅक्टर व बैलजोड्यांच्या सहाय्याने मशागतीची कामे वेगाने सुरू असून, वेळेत पाऊस झाल्यामुळे यंदा चांगल्या उत्पादनाची आशा शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
दमदार पावसामुळे परिसरातील विहिरी, नाले व जलस्रोतांमध्येही पाण्याची वाढ झाली असून ग्रामीण भागात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
