रिसोड ( प्रतिनिधी)
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर रिसोड शहरात ‘हर घर तिरंगा’14ॴगस्ट रोजी अभियानांतर्गत शहरातून तिरंगा रॅली काढण्यात आली. या रॅलीत नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. हातात तिरंगा ध्वज घेऊन देशभक्तीपर घोषणा देत सहभागी नागरिकांनी शहरातून मार्गक्रमण केले. त्यामुळे शहरात देशभक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.
रॅलीदरम्यान नागरिकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक घरावर तिरंगा फडकवून
राष्ट्रध्वजाचा सन्मान करावा आणि राष्ट्रीय उत्सव उत्साहात साजरा करावा, असे आवाहन नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने करण्यात आले. ‘हर घर तिरंगा’ अभियानाचा उद्देश नागरिकांमध्ये राष्ट्रध्वजाबद्दल आदराची भावना निर्माण करण्यासोबतच देशप्रेमाची या अभियानाच्या माध्यमातून शहरातील
प्रत्येक कुटुंबाने आपल्या घरावर तिरंगा फडकवून या राष्ट्रीय उपक्रमात सहभागी व्हावे, असा संदेश देण्यात आला. रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ‘हर घर तिरंगा’ अभियान यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होते.










