जळकोट : सहजयोग परिवार लातूर यांच्या वतीने जळकोट शहरात दर गुरुवारी सायंकाळी ६ ते ७ या वेळेत सहजयोग ध्यान केंद्राचे आयोजन करण्यात येत आहे. हे ध्यान केंद्र श्री महादेव मंदिर मंगल कार्यालय येथे नियमितपणे भरविण्यात येते.
सहजयोग ध्यान पद्धतीमुळे मानसिक शांतता, आरोग्य सुधारणा तसेच सकारात्मक जीवनशैली विकसित होण्यास मदत होत असल्याचे आयोजकांनी सांगितले. विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्रता वाढून प्रगती साधता येते, आरोग्य चांगले राहण्यास मदत होते तसेच कृषी व पशुधन विकासासाठीही या ध्यान पद्धतीचा लाभ होत असल्याचे सांगण्यात आले.
जळकोट शहरातील सर्व नागरिक, विद्यार्थी, व्यापारी तसेच व्यावसायिकांनी या नियमित ध्यान केंद्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन केंद्र संयोजक श्री. धुळशेट्टे गोविंद, मठपती घाळपा, खंदारे ज्योती आणि मरशिवणे लक्ष्मी यांनी केले आहे.
