• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अतिवृष्टीच्या संकटात रत्नागिरी पोलीस प्रशासन अलर्ट; पोलीस अधीक्षक नितीन बगाटे स्वतः घटनास्थळी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 7, 2026
in Blog
0
0
SHARES
6
VIEWS
Ad 1

दापोली | प्रतिनिधी

रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असून, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस प्रशासन युद्धपातळीवर कार्यरत आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे (भा.पो.से.) यांनी स्वतः कशेडी घाट, खेड, चिपळूण तसेच इतर संवेदनशील आणि पूरग्रस्त भागांना भेट देऊन परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेतला.

RelatedPosts

नागपंचमीच्या मुहूर्तावर शेतकरी गटाचा जलसंधारणाचा उपक्रम; श्रमदानातून वनराई बंधारा उभारला

मानवतचे तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्या मातोश्रींचे वृद्धापकाळाने दुःखद निधन

लाचखोर उपनिरीक्षक महादेव देशमुख एसीबीच्या जाळ्यात; ३५ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले

कशेडी घाटात वाहतूक सुरळीत राहावी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेला कोणताही धोका निर्माण होऊ नये यासाठी त्यांनी घटनास्थळी उपस्थित राहून पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. धोकादायक ठिकाणी सतर्कतेचे फलक उभारण्यात आले असून, वाहतूक कोंडीत अडकलेल्या प्रवाशांसाठी पिण्याचे पाणी आणि अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली.

खेड शहरात जगबुडी नदीच्या पुरामुळे बाधित झालेल्या परिसराची पाहणी करत त्यांनी नागरिक आणि व्यापाऱ्यांशी संवाद साधला. अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

यानंतर चिपळूण पोलीस ठाण्यात भेट देऊन आपत्ती व्यवस्थापनासाठी उपलब्ध असलेल्या आपत्कालीन साहित्याची पाहणी करण्यात आली. संभाव्य आपत्कालीन परिस्थितीत तातडीने आणि प्रभावीपणे प्रतिसाद देण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले.

रत्नागिरी जिल्हा पोलीस प्रशासन पूरस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून असून, नागरिकांच्या जीवित आणि मालमत्तेच्या संरक्षणासाठी बचाव व मदतकार्य वेगाने सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तातडीने मदत उपलब्ध करून देण्यासाठी संपूर्ण पोलीस यंत्रणा सज्ज असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

संकटाच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच नागरिकांच्या मदतीसाठी प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करणाऱ्या रत्नागिरी पोलीस प्रशासनाच्या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Previous Post

सोयगाव तालुक्यातील ८४ गावांतील विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप; सामाजिक उपक्रमाला नागरिकांचे सहकार्याचे आवाहन

Next Post

यवतमाळ–वाशीम लोकसभा अध्यक्षपदी सुनील पाटील चिंचोलकर यांची नियुक्ती

Related Posts

Blog

नागपंचमीच्या मुहूर्तावर शेतकरी गटाचा जलसंधारणाचा उपक्रम; श्रमदानातून वनराई बंधारा उभारला

August 20, 2026
15
Blog

मानवतचे तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्या मातोश्रींचे वृद्धापकाळाने दुःखद निधन

August 20, 2026
9
Blog

लाचखोर उपनिरीक्षक महादेव देशमुख एसीबीच्या जाळ्यात; ३५ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले

August 20, 2026
1
Blog

तांभा जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी प्रमोद मडावी यांची बिनविरोध निवड

August 20, 2026
20
Blog

सैनिक संघटनेचा अनोखा उपक्रम; विद्यार्थिनींकडून सीमेवरील सैनिकांना राख्या

August 20, 2026
22
संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान
Blog

संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

August 17, 2026
8
Next Post

यवतमाळ–वाशीम लोकसभा अध्यक्षपदी सुनील पाटील चिंचोलकर यांची नियुक्ती

ताज्या बातम्या

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

August 20, 2026

नागपंचमीच्या मुहूर्तावर शेतकरी गटाचा जलसंधारणाचा उपक्रम; श्रमदानातून वनराई बंधारा उभारला

August 20, 2026

मानवतचे तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्या मातोश्रींचे वृद्धापकाळाने दुःखद निधन

August 20, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In