फलटण | प्रतिनिधी
सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील खामगाव येथे बुधवारी (८ जुलै) सकाळी अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. विजेचा धक्का लागून एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, घरासमोर असलेल्या उघड्या विद्युत केबलच्या संपर्कात प्रथम एका व्यक्तीचा हात आला. त्यांना वाचवण्यासाठी कुटुंबातील इतर सदस्य धावले. मात्र, एकामागोमाग एक सर्वांनाच विजेचा जोरदार धक्का बसल्याने चौघांचाही जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच फलटण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले असून, घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे खामगावसह संपूर्ण फलटण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, उघड्या विद्युत तारा व केबल्समुळे अशा दुर्घटना टाळण्यासाठी महावितरणने तातडीने आवश्यक दुरुस्ती व सुरक्षेच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
