सेलू | प्रतिनिधी

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार पुनर्निरीक्षण कार्यक्रमांतर्गत सेलू येथील विद्यानगर परिसरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर गार्डन परिसरात विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
मतदार यादी अद्ययावत करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात मतदार नोंदणी, नाव दुरुस्ती तसेच आवश्यक माहिती अद्ययावत करण्याची प्रक्रिया पार पडली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संजय ठाकर, मंगेश गोरे, अमोल हळणी यांनी प्रमुख भूमिका बजावली. तसेच सुबोध देशमुख आणि राम घोगरे यांनी सहायक म्हणून कार्य केले.
यावेळी ईआरओ सुनील राठोड तसेच एसएम तायडे यांनी कार्यक्रमस्थळी भेट देऊन आयोजनाची पाहणी केली. त्यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांचे कौतुक करत कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शुभेच्छा दिल्या.
या उपक्रमामुळे मतदार यादी अधिक अचूक व अद्ययावत करण्यास मदत होणार असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार जनजागृतीलाही चालना मिळाल्याचे उपस्थितांनी सांगितले.
