• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मुख्यमंत्र्यांची कर्जमाफीची घोषणा; १३ लाख शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत दिलासा, आमदार रणधीर सावरकरांनी मानले आभार

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 10, 2026
in Blog
0
0
SHARES
45
VIEWS
Ad 1

अकोला | प्रतिनिधी

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा करत सन २०१९ च्या महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील सुमारे १३ लाख शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांऐवजी दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ देण्याची घोषणा केली. या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.

RelatedPosts

॥शिष्यवृत्ती गुणवंतांचा गौरव: मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान ॥

साखरेच्या वाढलेल्या दराच्या तुलनेत ऊस उत्पादकांना योग्य दराची मागणी; साखर संकुलावर तीव्र आंदोलन

अंतेश्वर बंधाऱ्यात बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्याची मागणी

या निर्णयाबद्दल आमदार रणधीर सावरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानत, महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे पुन्हा सिद्ध झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.

आमदार रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वाखाली विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील आमदारांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे निवेदन देऊन २०१९ च्या कर्जमुक्ती योजनेतील लाभार्थ्यांनाही अधिक दिलासा देण्याची मागणी केली होती. पावसाळी अधिवेशनादरम्यानही आमदार सावरकर यांनी सभागृहात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सविस्तर भूमिका मांडत या मागणीचा पाठपुरावा केला होता.

शासनाने यापूर्वी जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना मिळत असतानाच, २०१९ च्या योजनेतील उर्वरित लाभार्थ्यांनाही समान दिलासा मिळावा, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात ही घोषणा केली.

या निर्णयाचे स्वागत करत आमदार रणधीर सावरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच महायुती सरकारचे आभार मानले. राज्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाने संवेदनशील भूमिका घेतल्याचे त्यांनी सांगितले.

Previous Post

सेलूतील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात मतदार पुनर्निरीक्षण कार्यक्रम उत्साहात संपन्न

Next Post

सिल्लोडच्या पूर्णा नदीत सांडपाणी; प्रदूषणावर कायमस्वरूपी उपाययोजनांची खासदार डॉ. कल्याणराव काळे यांची मागणी

Related Posts

॥शिष्यवृत्ती गुणवंतांचा गौरव: मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान ॥
Blog

॥शिष्यवृत्ती गुणवंतांचा गौरव: मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान ॥

August 25, 2026
1
Blog

साखरेच्या वाढलेल्या दराच्या तुलनेत ऊस उत्पादकांना योग्य दराची मागणी; साखर संकुलावर तीव्र आंदोलन

August 25, 2026
3
अंतेश्वर बंधाऱ्यात बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्याची मागणी
Blog

अंतेश्वर बंधाऱ्यात बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्याची मागणी

August 25, 2026
1
सप्ताहाची सांगता; सरला बेटाचा प्रमुख तीर्थस्थळ म्हणून विकास करणार
Blog

सप्ताहाची सांगता; सरला बेटाचा प्रमुख तीर्थस्थळ म्हणून विकास करणार

August 25, 2026
8
“वर्गात दिसतो तो शिक्षक… पण वर्गाबाहेर जगतो तो एक संघर्ष!”
Blog

“वर्गात दिसतो तो शिक्षक… पण वर्गाबाहेर जगतो तो एक संघर्ष!”

August 25, 2026
35
सीमेवरील जवानांसाठी सावर्डे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पाठवल्या स्वनिर्मित राख्या
Blog

सीमेवरील जवानांसाठी सावर्डे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पाठवल्या स्वनिर्मित राख्या

August 25, 2026
2
Next Post

सिल्लोडच्या पूर्णा नदीत सांडपाणी; प्रदूषणावर कायमस्वरूपी उपाययोजनांची खासदार डॉ. कल्याणराव काळे यांची मागणी

ताज्या बातम्या

॥शिष्यवृत्ती गुणवंतांचा गौरव: मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान ॥

॥शिष्यवृत्ती गुणवंतांचा गौरव: मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान ॥

August 25, 2026

साखरेच्या वाढलेल्या दराच्या तुलनेत ऊस उत्पादकांना योग्य दराची मागणी; साखर संकुलावर तीव्र आंदोलन

August 25, 2026
अंतेश्वर बंधाऱ्यात बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्याची मागणी

अंतेश्वर बंधाऱ्यात बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्याची मागणी

August 25, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In