
खारपाडा, पेण | प्रतिनिधी :
खारपाडा (ता. पेण) येथील रहिवासी कै. सौ. इंदूबाई रत्नाकर घरत यांचे रविवार, ५ जुलै २०२६ रोजी दुपारी १.४५ वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्या ६१ वर्षांच्या होत्या.
कै. इंदूबाई घरत या प्रेमळ, मनमिळावू व धार्मिक वृत्तीच्या होत्या. गेल्या दोन वर्षांपासून त्या आजारी असूनही त्यांनी ईश्वरभक्तीचा मार्ग अखंड जोपासला. श्री समर्थ आध्यात्मिक सेवा समिती, रेवदंडा यांच्या माध्यमातून श्री रत्नाकर घरत यांच्या निवासस्थानी नियमित होणाऱ्या श्री समर्थ बैठका, महिला-पुरुष भक्तीमार्ग मार्गदर्शन व श्रवण-निरूपण कार्यक्रमांना त्यांनी मोलाचे सहकार्य केले.
त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आध्यात्मिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांसह श्री समर्थ परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यांच्या पश्चात पती रत्नाकर काशीराम घरत, पुत्र ज्ञानेश्वर घरत व राकेश घरत, कन्या सौ. धनश्री पंकज पाटील, नातवंडे तसेच मोठा परिवार असा आप्तपरिवार आहे.
कै. इंदूबाई घरत यांच्या दशक्रिया विधीचा कार्यक्रम मंगळवार, १४ जुलै २०२६ रोजी श्री क्षेत्र पाली उद्धर येथे होणार असून, उत्तरकार्य (तेरावा) शुक्रवार, १७ जुलै २०२६ रोजी त्यांच्या राहत्या घरी खारपाडा (ता. पेण) येथे संपन्न होणार आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली!
“जो आवडतो सर्वांना, तोच आवडे देवाला.” 🙏
