पातूर | प्रतिनिधी
वन विभाग कार्यालय, पातूर यांच्या वतीने वन महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला. उपस्थितांनी वृक्ष लागवड करून त्यांचे संगोपन व संवर्धन करण्याचा संकल्प केला.
वन महोत्सवानिमित्त वन विभागाच्या वतीने एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत विविध संघांतील खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत क्रीडाभावना आणि संघभावनेचे उत्कृष्ट दर्शन घडविले.
या कार्यक्रमाला वनपरिक्षेत्र अधिकारी पवन जाधव, अविनाश घुगे, विष्णू सोनुणे, पत्रकार नातीक शेख, अरुण राठोड, आदित्य देशमुख, शंकर सावळे, ओम सावके, दयाल, गोलू जंजाळ तसेच वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि क्रिकेटपटू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षण आणि क्रीडा संस्कृतीचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. उपस्थितांनी वन महोत्सवाच्या उपक्रमांचे स्वागत करत भविष्यातही अशा समाजोपयोगी आणि पर्यावरणपूरक उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्यात यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.









