बांबवडे प्रतिनिधी
ऐतिहासिक पावनखिंड येथे नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्या सौ. स्नेहल केतन वेल्हाळ यांनी स्मृतीस्थळाला भेट देऊन पुष्पांजली अर्पण केली.
स्वराज्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या शौर्य, त्याग आणि स्वराज्यनिष्ठेला अभिवादन करत, यावेळी वृक्षारोपणाचा उपक्रमही राबविण्यात आला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत इतिहास संवर्धनासोबतच निसर्ग संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना सौ. स्नेहल वेल्हाळ म्हणाल्या, “नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांचे शौर्य, त्याग आणि स्वराज्यनिष्ठा भावी पिढ्यांसाठी कायम प्रेरणादायी राहतील. त्यांच्या कार्यातून देशप्रेम, कर्तव्यनिष्ठा आणि बलिदानाची प्रेरणा मिळते.”
या उपक्रमातून ऐतिहासिक वारशाचे जतन करण्याबरोबरच पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आल्याने परिसरातील नागरिकांकडून या उपक्रमाचे स्वागत करण्यात येत असून, सौ. स्नेहल वेल्हाळ यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

