
📰 सारथी महाराष्ट्राचा न्यूज | बारामती | प्रतिनिधी
आषाढी वारीनिमित्त संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या लाखो वारकरी भाविकांच्या सेवेसाठी वीर योद्धा प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पाणी बाटल्या व ताज्या फळांचे वाटप करण्यात आले. माऊलींच्या भक्तांची सेवा करण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला वारकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या सेवाकार्याचे आयोजन प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष बापू ढावरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. उन्हाच्या तीव्रतेत विठ्ठल नामाचा गजर करत पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना पिण्याचे पाणी आणि फळांचे वाटप करून दिलासा देण्यात आला.
यावेळी संस्थापक अध्यक्ष बापू ढावरे, बारामती तालुका अध्यक्ष अमोल बनसोडे, खंडाळा तालुका अध्यक्ष स्वप्निल जावळे, पुरंदर तालुका अध्यक्ष नितीन साळुंखे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
तसेच धनंजय खरात, अनिकेत बिचुकले, रोहन ढावरे, दादा धायगुडे, अभी भैया बिचुकले, महेश खरात, चिकू खरात, सुरज धायगुडे, भाऊ फडतरे, अनिकेत कांबळे, सनी ढावरे, विराज भोसले तसेच प्रतिष्ठानचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
वीर योद्धा प्रतिष्ठानच्या या सेवाभावी सामाजिक उपक्रमाचे वारकरी तसेच नागरिकांकडून सर्वत्र कौतुक होत असून, वारीतील सेवाभावाची परंपरा अधिक दृढ झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
