• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याकडून ‘उल्लास-नवभारत साक्षरता वारी २०२६’ प्रकल्पास शुभेच्छा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 16, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
3
VIEWS
Ad 1

प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालनालयाच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या ‘उल्लास-नवभारत साक्षरता वारी २०२६’ या उपक्रमास महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी बारामती तालुक्यातील काठेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

RelatedPosts

मुंगसापूर बोगस डॉक्टरप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचा अहवाल; उपोषणानंतर प्रशासनाची कारवाई

आकाश दुबैया हत्या प्रकरण : आरोपींवर मोक्का लावण्याची मागणी; एसपींच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

कुरुंदवाड पोलिसांची धडक कारवाई; मटका, गावठी दारू व मावा विक्रीप्रकरणी तिघांवर गुन्हे

राज्याच्या शैक्षणिक धोरणानुसार शिक्षण संचालक (योजना) कृष्णकुमार पाटील, शिक्षण उपसंचालक राजेश क्षीरसागर, उपशिक्षण अधिकारी सचिन अनंतकवळस आणि भाऊसाहेब सरक यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी उल्लास-नवभारत साक्षरता वारी प्रकल्पाचे कौतुक करत, या माध्यमातून साक्षरता, नशामुक्ती आणि रस्ता वाहतूक सुरक्षेबाबत प्रभावी जनजागृती होत असल्याचे सांगितले. समाजात सकारात्मक बदल घडविण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमात राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाचे विभागीय नोडल अधिकारी डॉ. मणिलाल शिंपी यांनी आरएसपी (Road Safety Patrol) अधिकारी-शिक्षक युनिटच्या माध्यमातून पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमांचे पालन, ट्रॅफिक सेन्स विकसित करणे आणि अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी जनजागृतीचे महत्त्व विशद केले. या कार्याबद्दल उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी आरएसपी अधिकारी-शिक्षक युनिटचे विशेष अभिनंदन केले.

यावेळी केंद्रप्रमुख अजित नांगरे, शिक्षण उपसंचालक राजेश क्षीरसागर, युट्युबर राजेंद्र जगे, ह.भ.प. गणेश महाराज भगत, जोशी महाराज, आरएसपी अधिकारी-शिक्षक संजय खैरनार, जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी तसेच स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपसंचालक राजेश क्षीरसागर यांनी साक्षरता वारी प्रकल्पाचे उद्दिष्ट, नियोजन आणि समाजातील विविध घटकांच्या सहभागाचे महत्त्व स्पष्ट करत हा उपक्रम अधिक व्यापक करण्याचे आवाहन केले.

Tags: Yashwant mahajan
Previous Post

श्रीरामपूरात तृतीयपंथीय मतदारांची शंभर टक्के गणना पत्रे पूर्ण; एसआयआर मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग

Next Post

नगरपंचायतीच्या लेखी आश्वासनानंतर ‘हलगी नाद’ आंदोलन स्थगित; कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

Related Posts

ताज्या घडामोडी

मुंगसापूर बोगस डॉक्टरप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचा अहवाल; उपोषणानंतर प्रशासनाची कारवाई

July 16, 2026
1
ताज्या घडामोडी

आकाश दुबैया हत्या प्रकरण : आरोपींवर मोक्का लावण्याची मागणी; एसपींच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

July 16, 2026
3
ताज्या घडामोडी

कुरुंदवाड पोलिसांची धडक कारवाई; मटका, गावठी दारू व मावा विक्रीप्रकरणी तिघांवर गुन्हे

July 16, 2026
49
ताज्या घडामोडी

शिरूरच्या महिला सक्षमीकरणासाठी नगराध्यक्षा ऐश्वर्याताई पाचर्णे यांचा मंत्रालयात पाठपुरावा; अंगणवाडी व ‘सखी वन स्टॉप सेंटर’साठी महत्त्वपूर्ण मागण्या

July 16, 2026
28
ताज्या घडामोडी

सांगा… कसं जगावं? पाऊस पडेना अन् बियाणं उगवेना

July 15, 2026
10
ताज्या घडामोडी

उजनीतून तातडीने पाणी सोडा; शेतकऱ्यांना पूर्ववत आठ तास वीज द्या

July 15, 2026
14
Next Post

नगरपंचायतीच्या लेखी आश्वासनानंतर 'हलगी नाद' आंदोलन स्थगित; कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

ताज्या बातम्या

पावसाने दडी मारल्याने जामखेड तालुक्यात दुबार पेरणीचे संकट; खरीप पिके करपू लागली

July 16, 2026

मुंगसापूर बोगस डॉक्टरप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचा अहवाल; उपोषणानंतर प्रशासनाची कारवाई

July 16, 2026

दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करणे हे माझे कर्तव्य – महेंद्रशेठ घरत

July 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In