• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

देशातील ६० कोटी मतदारांची ‘एसआयआर’ प्रक्रिया पूर्ण; स्थलांतरित मतदारांच्या नोंदणीबाबत आयोगाचा विचार

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 18, 2026
in Blog
0
0
SHARES
4
VIEWS
Ad 1

📰 सारथी महाराष्ट्राचा न्यूज | नवी दिल्ली | प्रतिनिधी

देशातील मतदारयाद्या अधिक अचूक आणि पारदर्शक करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या विशेष सखोल फेरतपासणी (SIR) मोहिमेत आतापर्यंत ६० कोटी मतदारांची प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी दिली.

RelatedPosts

सच्चाई व माणुसकीचे दर्शन! हरवलेले सोन्याचे गंठण प्रामाणिकपणे परत; व्यापाऱ्याचा सत्कार

चंदगडचे उपक्रमशील शिक्षक संजय साबळे यांची ‘कोजिमाशि’च्या संचालकपदी निवड; मराठी अध्यापक संघातर्फे सत्कार

व्यंकटराव हायस्कूलमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न

राष्ट्रीय पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की, मृत, स्थलांतरित, दुबार तसेच परदेशात वास्तव्यास असलेल्या मतदारांमुळे मतदारयाद्यांमध्ये निर्माण झालेल्या त्रुटी दूर करण्यासाठी निवडणूक आयोगाने ‘एसआयआर’चा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ही संपूर्ण प्रक्रिया संविधानातील तरतुदींनुसार आणि पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येत असल्याचा दावा त्यांनी केला.

सध्या महाराष्ट्र, कर्नाटक, दिल्लीसह विविध राज्यांतील सुमारे ३० कोटी मतदारांची एसआयआर प्रक्रिया सुरू असून, सप्टेंबरअखेरपर्यंत देशातील बहुतांश मतदारांची ही प्रक्रिया पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

‘एसआयआर’ पूर्ण झाल्यानंतर ज्या राज्यांत विधानसभा निवडणुका झाल्या, त्या ठिकाणी लोकसभा निवडणुकीपेक्षा अधिक मतदानाची नोंद झाल्याचा दावाही ज्ञानेश कुमार यांनी यावेळी केला.

स्थलांतरित मतदारांच्या नोंदणीबाबत निर्णय लवकरच

मुंबई महानगर प्रदेशासह राज्यातील विविध पुनर्विकास आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांचे स्थलांतर झाले आहे. अशा मतदारांची नोंदणी त्यांच्या मूळ मतदारसंघातच कायम ठेवण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे.

हा प्रस्ताव आयोगाच्या विचाराधीन असून, त्यावर लवकरच निर्णय घेतला जाईल, अशी माहिती केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी दिली.

Previous Post

अतिवृष्टीचा परिणाम; ‘एसआयआर’ प्रक्रियेला १० दिवसांची मुदतवाढ, निवडणूक आयोगाचा निर्णय

Next Post

फलटण नगरीत वारकऱ्यांचे उत्साहात आगमन; ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषाने शहर भक्तिमय

Related Posts

Blog

सच्चाई व माणुसकीचे दर्शन! हरवलेले सोन्याचे गंठण प्रामाणिकपणे परत; व्यापाऱ्याचा सत्कार

July 19, 2026
2
Blog

चंदगडचे उपक्रमशील शिक्षक संजय साबळे यांची ‘कोजिमाशि’च्या संचालकपदी निवड; मराठी अध्यापक संघातर्फे सत्कार

July 19, 2026
1
Blog

व्यंकटराव हायस्कूलमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न

July 19, 2026
1
आजऱ्याच्या सोहम चव्हाणचे NEET व JEE Main परीक्षेत दैदिप्यमान यश
Blog

आजऱ्याच्या सोहम चव्हाणचे NEET व JEE Main परीक्षेत दैदिप्यमान यश

July 19, 2026
1
डॉ. सुखदीप म्हंकाळी चौगुले यांना यांत्रिकी अभियांत्रिकी शाखेत पीएच.डी. पदवी
Blog

डॉ. सुखदीप म्हंकाळी चौगुले यांना यांत्रिकी अभियांत्रिकी शाखेत पीएच.डी. पदवी

July 19, 2026
3
Blog

रायगाव येथे निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याचे उत्साहात स्वागत; मा. अमृता ताई वाघे यांची प्रमुख उपस्थिती

July 19, 2026
10
Next Post

फलटण नगरीत वारकऱ्यांचे उत्साहात आगमन; 'ज्ञानोबा-तुकाराम'च्या जयघोषाने शहर भक्तिमय

ताज्या बातम्या

सच्चाई व माणुसकीचे दर्शन! हरवलेले सोन्याचे गंठण प्रामाणिकपणे परत; व्यापाऱ्याचा सत्कार

July 19, 2026

चंदगडचे उपक्रमशील शिक्षक संजय साबळे यांची ‘कोजिमाशि’च्या संचालकपदी निवड; मराठी अध्यापक संघातर्फे सत्कार

July 19, 2026

व्यंकटराव हायस्कूलमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न

July 19, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In