जळकोट | प्रतिनिधी
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त जळकोट शहरात विविध सामाजिक व राजकीय संघटनांच्या वतीने त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या साहित्य, शाहिरी आणि समाजप्रबोधनाच्या कार्याला आदरांजली वाहण्यात आली. उपस्थितांनी त्यांच्या सामाजिक समता, बंधुता आणि कष्टकरी समाजाच्या उन्नतीसाठी दिलेल्या योगदानाचे स्मरण केले.
या अभिवादन कार्यक्रमात संपूर्ण मातंग समाजाचे पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक, युवक, समाजसुधारक कार्यकर्ते, महिला तसेच शहरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारीही उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा जपत सामाजिक न्याय, समता आणि बंधुभावासाठी कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला. त्यांच्या साहित्य व कार्यातून समाजाला आजही प्रेरणा मिळत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.


