पैठण | प्रतिनिधी
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी दि. 20 जुलै रोजी स्वराज माध्यमिक विद्यालय, ब्राह्मणगाव (ता. पैठण) येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाला सिडको आगाराच्या आगार व्यवस्थापक श्रीमती स्वाती घोडे, वाहतूक निरीक्षक शाह, वाहतूक नियंत्रक बावस्कर व काकडे, ग्रामपंचायतीचे सरपंच नवनाथ भाऊ सांगळे, बबनराव ढाकणे, अजिंक्य ढाकणे, अनिल सांगळे, कडेठाणचे माजी उपसरपंच नंदू काका चव्हाण, देवगावचे गीते भाऊ तसेच शाळेचे मुख्याध्यापक सोनवणे सर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते चिंचेच्या वृक्षाचे रोप लावून वृक्षारोपण करण्यात आले. उपस्थितांनी पर्यावरण संरक्षणाची शपथ घेत अधिकाधिक वृक्ष लागवड व संवर्धन करण्याचा संदेश दिला.
शालेय परिसरात आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जनजागृती निर्माण करण्यासोबतच वृक्षसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
