सातारा | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने ‘ग्रामोद्योग भरारी पुरस्कार 2026’ साठी नामांकने मागविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ग्रामीण भागात शासकीय योजनांच्या माध्यमातून यशस्वी उद्योग उभारणाऱ्या उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी ही पुरस्कार योजना राबविण्यात येत आहे.
इच्छुक उद्योजकांनी या पुरस्कारासाठी अर्ज करावेत. अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर तसेच खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या जिल्हा कार्यालयात उपलब्ध आहेत.
जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी निसार तांबोळी यांनी आवाहन केले आहे की, इच्छुकांनी आपले नामांकन अर्ज दि. 28 जुलै 2026 पर्यंत संबंधित जिल्हा ग्रामोद्योग कार्यालयात सादर करावेत.

