
सारथी महाराष्ट्राचा न्यूज | धारासुर | प्रतिनिधी
ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात पायी वारी करणारे ज्येष्ठ वारकरी कै. मंचक दत्तराव कदम (धारासुरकर) यांचे बुधवार, दि. २२ जुलै २०२६ रोजी पहाटे सुमारे ५.३० वाजता वेळापूर पुढे पालखी दिंडीत चालत असताना निधन झाले. निधनाच्या वेळी ते “ज्ञानोबा माऊली… तुकाराम” असा नामजप करत वारीत सहभागी होते. त्यांच्या निधनाची बातमी समजताच वारकरी संप्रदायात हळहळ व्यक्त करण्यात आली.
मृत्यूसमयी त्यांचे वय ७५ वर्षे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, दोन भाऊ, नातवंडे तसेच मोठा परिवार आहे. माणिक (नाना) कदम व माधव कदम यांचे ते मोठे बंधू होते.
कै. मंचक दत्तराव कदम यांच्यावर दि. २२ जुलै २०२६ रोजी दुपारी ३.४५ वाजता धारासुर येथील दक्षिणवाहिनी गोदावरी नदीकाठी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने परिसरातील वारकरी, नातेवाईक आणि ग्रामस्थांनी शोक व्यक्त केला.

