
पाथरी | प्रतिनिधी
दिल्ली येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आवाहनानुसार दि. २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर पाथरी येथे वंचित बहुजन आघाडी तसेच समविचारी पक्ष आणि संघटनांच्या वतीने उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नगर परिषदेचे मुख्याधिकारी आणि राज्य परिवहन महामंडळाच्या आगारप्रमुख यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनाद्वारे पाथरी तालुक्यातील व्यापारी, शेतकरी, विद्यार्थी तसेच नागरिकांनी महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी होऊन शांततापूर्ण पद्धतीने पाठिंबा द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. बंदच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्जचा निषेध नोंदविण्यात येणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

