प्रतिनिधी : यशवंत महाजन
६०० हून अधिक शिक्षकांची ऐतिहासिक उचस्थिती; संघटना बळकट करण्याचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे आवाहन
जव्हारच्या निसर्गरम्य, ऐतिहासिक आणि पवित्र भूमीत रविवार, दि. २ ऑगस्ट २०२६ रोजी महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेच्या वतीने आयोजित “शिक्षक मेळावा २०२६” अत्यंत उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध आणि दिमाखदार वातावरणात संपन्न झाला. शिक्षकांची अभूतपूर्व उपस्थिती, संघटनात्मक एकजूट आणि प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे हा मेळावा ऐतिहासिक ठरला.
या मेळाव्याचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा शिक्षक आमदार आदरणीय श्री. ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी भूषविले, तर मेळाव्याचे उदघाटन सन्माननीय श्री. हरिश्चंद्र भोये, आमदार विक्रमगड विधानसभा मतदारसंघ यांच्या शुभहस्ते झाले.
मेळाव्याचे अध्यक्ष, उद्घाटक तसेच उपस्थित मान्यवरांचे स्वागत शिवछत्रपती विधालय साखरे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आकर्षक लेझीम नृत्याने केले. ईशस्तवन आणि स्वागत गीताने सभागृहातील वातावरण प्रसन, आनंदी आणि प्रेरणादायी झाले. या ऐतिहासिक मेळाव्यास पालघर जिल्हह्यातील ६०० हून अधिक शिक्षक व शिक्षकतर बांधवांनी उत्स्फूर्त उपस्थिती लावत संघटनेच्या एकजुटीची आणि ताकदीची भव्य प्रचिती दिली.
कार्यक्रमाचे प्रारलाविक पालघर ग्रामीणचे जिल्हा सचिव श्री. प्रशांत पारगावकर सर यांनी केले. यावेळी पालघर शहरचे जिल्हाध्यक्ष श्री. महेश कुडू, कोकण विभागाचे अध्यक्ष श्री. प्रशांत भामरे सर आणि राज्य उपाध्यक्ष श्री. राजेश पाटील सर यांनी विविध महत्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन केले.
यावेळी महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सौ. रोशनी गावड, राज्य सचिव श्री. अरूण भोईर, जिल्हा संपर्कप्रमुख तथा समन्वयक श्री. विठ्ठलजी गोरे तसेच पालघर जिल्हा अल्पसंख्यांक सेलचे श्री. रॉबर्ट आस्मेिडा सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या मेळाव्याचे विशेष आकर्षण म्हणजे अनेक शिक्षक बांधवांनी महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेत जाहीर प्रवेश करून संघटनेच्या विचारांशी व कायीशी जोडले जाण्याचा संकल्प केला.
शिक्षकांच्या प्रलतित प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी आदरणीय ज्ञानेखर म्हात्रे सरांनी केलेल्या कार्यींचा अनुभव सांगताना अधिनी तंवर मॅडम, श्रीमती चित्रा शेळके मॅडम आणि श्री. राहुल पाटील सर यांनी आपल्या मनोगतातून सरांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
मेळाव्यात मार्गदर्शन करताना संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्री. ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी शिक्षकांची विद्यार्थ्यांना घडविण्यातील भूमिका, गुणवत्तापूर्ण शिक्षणांची जबाबदारी आणि समाजाप्रती शिक्षकांचे कर्तव्य यावर प्रेरणादायी विचार मांडले. तसेच संघटना अधिक बळकट करण्यासाठी प्रत्येक सभासदांने किमान ५ ते १० नवीन सभासद जोडांवेत, असे आवाहन केले.
यावेळी आश्रम शाळेच्या शिक्षिका सौ. दिपाली सांबरे मॅडम यांनी ज्ञानेश्वर म्हात्रे सरांच्या कार्याचा गौरव करणारे उत्स्फूर्त गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
मेळावा यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेणारे जिल्हा संपर्कप्रमुख तथा समन्वयक विठ्ठलजी गोरे, राज्य उपाध्यक्ष राजेश पाटील सर, जव्हारचे तालुकाअध्यक्ष तुंवदा सर, मोखाडांचे तालुका अध्यक्ष प्रशांत स्कारी, वाडा विभागांचे विनोद पाटील सर, विक्रमगड विभागांचे दिपक राव तसेच त्यांच्या संपूर्ण टीमचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यांत आले.
यावेळी मंचांवर ठाणे शहरचे अध्यक्ष वसंत जोहरे, ठाणे ग्रामीणचे अध्यक्ष धनाजी ढवळी, कोकण विभाग सदस्य अरविंद ठाकरे, स्वयं अर्थसहावित शाळांचे जिल्हाध्यक्ष दीपक कुलकर्णी, राजेंद्र पाटील,
राजेंद्र सांबरे, शशिकांत पाटील, योगेश नंदन, जीतन कदम, समीर पिंपळे, जयंत काव, श्रीमती जयमाला सुरेंद्र सिंग, रराकांत घरत, सुनील मोकांशी, बाळकृष्ण पाटील, शरद गायकवाड, दीपक पतंगराव, नरेश राऊत, मुनिल सिंग,सुभेदार यादव, रवींद्र नाईक, दीपक देशमुख, जितेंद्र पाटील,मजन खरपडे, संजय वाघमोडे,जितेंद्र साठे, कमलेश भानुशाली,सचिन पाटील,बाळू भरस्ट, गुलाब नलावडे, अनंत खुलात, गोकुळ परदेशी, आशिष पाटील, सौ. योजना पाटील, कैलास देवरे,बापू राजपूत, प्रीतम घरत आणि सर्वेश मिश्रा यांची प्रमुख उपस्थिती होती.
आज जव्हारच्या भूमीतून एकच संदेश घुमला-
शिक्षकांची एकजूट संघटनेची ताकद !
शिक्षकांचा संघर्ष न्यायाचा विजय !
संघटना मजबूत शिक्षकांचा आवाज बुलंद !
महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचा विजय असो !
ज्ञानेश्खर म्हात्रे सरांच्या सक्षम नेतृत्वाचा विजय असो !











