• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

15 ऑगस्ट 2026 रोजी असलेल्या भारतीय स्वातंत्र्याच्या 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त समता गौरव पुरस्कार प्राप्त साहित्यिकप्रा.अरुण बाबारावजी बुंदेले यांचा लेख येथे वाचकांसाठी प्रकाशित करीत आहोत.

Pratik Tidke by Pratik Tidke
August 14, 2026
in महाराष्ट्र, यश निवड अभिनंदन, शिक्षण
0
0
SHARES
15
VIEWS
Ad 1

राष्ट्रीय सण स्वातंत्र्य दिन : जाज्वल्य अभिमान

RelatedPosts

पावसाच्या सरींतही पनवेल मध्ये तिरंगा पदयात्रेचा जल्लोष!

डिजिटल काळात ही शेतकऱ्यांना सातबारा साठी मारावे लागत वारंवार चक्र..

📰 महान गावात आदिवासी मिरवणुकीदरम्यान वाद; PSIसह पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण

           १५ ऑगस्ट २०२६ ला असलेल्या 

भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ॥ हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी अत्यंत अभिमानाचा आणि महत्त्वाचा आहे. १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपल्या देशाला ब्रिटिशांच्या प्रदीर्घ गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले. या स्वातंत्र्यासाठी अनेक देशभक्तांनी आणि क्रांतिकारकांनी क्रांतीची मशाल पेटवून आपल्या प्राणांचे बलिदान दिले. महात्मा गांधी, भगतसिंग,राजगुरू,सुखदेव,
चंद्रशेखर आझाद,सुभाषचंद्र बोस,मंगल पांडे,खुदीराम बोस,मदनलाल धिंग्रा,बाबू गेनू,वासुदेव बळवंत फडके,चाफेकर बंधू
या व इतर अनेक यासारख्या महान देशभक्तांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला. स्वातंत्र्य दिन आपल्याला या वीरांच्या त्यागाची आणि संघर्षाची आठवण करून देतो.


१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन हा आपला राष्ट्रीय सण आहे, जो संपूर्ण देशात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी देशाचे पंतप्रधान दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवितात. लाल किल्ल्यावरून पंतप्रधान देशाला संबोधित करतात आणि देशाच्या प्रगतीचा आढावा घेतात. सर्व शाळा, महाविद्यालये आणि सरकारी कार्यालयांमध्ये ध्वजारोहण केले जाते. या दिवशी विद्यार्थी राष्ट्रगीत गातात आणि देशभक्तीपर गीते सादर करतात. शाळांमध्ये विविध सांस्कृतिक आणि क्रीडा स्पर्धांचे आयोजन करून आनंद साजरा केला जातो. स्वातंत्र्य दिन संपूर्ण देशातील विविधतेत एकता दर्शवतो. हा दिवस आपल्याला जात, धर्म आणि पंथ विसरून एकत्र येण्याची प्रेरणा देतो. स्वातंत्र्य मिळाल्यामुळे आपल्याला स्वतःचे सरकार आणि संविधान बनवण्याचा अधिकार मिळाला.

हा दिवस आपल्याला आपल्या मूलभूत हक्कांची आणि कर्तव्यांची जाणीव करून देतो. स्वातंत्र्यामुळे भारताने विज्ञान, तंत्रज्ञान आणि आर्थिक क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. आज भारत जगातील एक शक्तिशाली आणि सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे, परंतु या स्वातंत्र्यासोबतच देशाची शांतता आणि सुरक्षा राखण्याची जबाबदारीही आपल्यावर आहे. देशातील गरिबी, निरक्षरता ,बेरोजगारी आणि भ्रष्टाचार नष्ट करणे आवश्यक आहे. स्वातंत्र्य दिन आपल्याला देशाच्या विकासासाठी योगदान देण्याची प्रतिज्ञा घेण्याची संधी देतो. आपल्या सीमेवर अहोरात्र रक्षण करणाऱ्या सैनिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. हा सण तरुणांमध्ये देशभक्तीची, शिस्तीची आणि देशसेवेची भावना जागृत करतो. प्रत्येक नागरिकाने देशाच्या कायद्याचा, नियमांचा आणि संविधानाचा आदर केला पाहिजे. आपला राष्ट्रीय ध्वज ‘तिरंगा’ हा आपल्या देशाच्या सन्मानाचे आणि अस्मितेचे प्रतीक आहे. या दिवशी आपण सर्वांनी मिळून देशाची अखंडता आणि एकता टिकवून ठेवण्याचा संकल्प केला पाहिजे. स्वातंत्र्य ही केवळ एक संकल्पना नसून, ती जबाबदारीने आणि गुण्यागोविंदाने जगण्याची कला आहे. भारताला एक जागतिक महासत्ता बनवण्यासाठी प्रत्येकाने प्रामाणिकपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे. ‘जय हिंद’ आणि ‘वंदे मातरम’ च्या घोषणांनी या दिवशी संपूर्ण देश दुमदुमून जातो. पूर्वजांच्या बलिदानातून मिळालेले हे अमूल्य स्वातंत्र्य आपण सदैव टिकवून ठेवले पाहिजे.


१५ ऑगस्ट २०२६ रोजी असलेल्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा देत असतानाच विकसित भारताचे ध्येय गाठण्यासाठी देशासमोर सध्या अनेक महत्त्वाची आर्थिक, सामाजिक , शैक्षणिक आणि पर्यावरणीय आव्हाने उभी झालेली आहेत त्याचाही विचार होणे आवश्यक आहे,असे मला वाटते.
भारताकडे जगातील सर्वात तरुण लोकसंख्या आहे, परंतु या तरुणांना त्यांच्या कौशल्यानुसार रोजगार उपलब्ध करून देणे हे मोठे आव्हान आहे. श्रीमंत आणि गरीब यांच्यातील वाढती दरी कमी करणे आणि मध्यमवर्गाला आर्थिक स्थैर्य देणे आवश्यक आहे. जागतिक पातळीवरील भू-राजकीय तणावामुळे होणारी महागाई आणि रुपयाचे मूल्य टिकवून ठेवणे या आर्थिक आव्हानांचा सामना करावा लागत आहे.


देशात AI, 6G चाचण्या आणि डिजिटल क्रांती वेगाने होत असताना, सायबर गुन्हे, डीपफेक आणि बनावट माहिती रोखणे हे मोठे आव्हान बनले आहे. तंत्रज्ञानाचा लाभ ग्रामीण आणि दुर्गम भागातील शेवटच्या नागरिकांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. देशात एकाच वेळी तीव्र उष्णतेच्या लाटा, दुष्काळ किंवा अचानक येणारा पूर ,अनपेक्षित येणारा मान्सून यामुळे शेती व्यवसाय धोक्यात आला आहे. वायू प्रदूषण,जल प्रदूषण आणि प्लास्टिक कचऱ्याचे व्यवस्थापन करणे अतिशय आवश्यक बनले आहे. कारण पर्यावरण प्रदूषणासोबतच प्राण्यांचे जीव प्लास्टिक कचऱ्यामुळे धोक्यात येत आहेत. सर्व स्तरांतील विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि परवडणारे शिक्षण व आरोग्य सेवा पुरविणे आवश्यक आहे. महिलांवरील आज होणारा अत्याचार थांबवून त्यांना प्रत्येक क्षेत्रात समान संधी देणे आवश्यक आहे.आज 79 वा स्वातंत्र्य दिन साजरा करीत असताना भारतरत्न – विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या भारतीय संविधानानुसार प्रत्येकाने आचरण करणे अत्यंत आवश्यक आहे. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे अत्यंत लोकप्रिय राष्ट्रभक्ती आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणाऱ्या
” या भारतात बंधुभाव नित्य वसू दे।
दे वरचि असा दे ॥ “


या अजरामर स्फूर्तीगीताचे स्मरण झाल्याशिवाय राहत नाही. प्रत्येकाने कार्य करताना मी देशाचा विकास करीत आहे ही भूमिका ठेवून कार्य केले पाहिजे. देशाने माझ्यासाठी काय केले यापेक्षा मी देशासाठी काय करू शकतो. या विचाराची रुजवणूक भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने प्रत्येकाने स्वतःच्या मनात निर्माण केली पाहिजे,तेव्हाच भारतीय स्वातंत्र्याचा हा सोहळा साजरा करण्याचा प्रत्येकाला आनंद होईल. ७९ व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ॥

      समता गौरव पुरस्कार प्राप्त 
            साहित्यिक
 प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले, 

अमरावती. ८०८७७४८६०९

Previous Post

आमदारांनी स्वतः बस चालवून घेतला प्रवासाचा अनुभव..

Next Post

“लोहरा येथील थरारक घटना; मानवत-चारठाणा पोलिसांची धडक कामगिरी”

Related Posts

पावसाच्या सरींतही पनवेल मध्ये तिरंगा पदयात्रेचा जल्लोष!
महाराष्ट्र

पावसाच्या सरींतही पनवेल मध्ये तिरंगा पदयात्रेचा जल्लोष!

August 14, 2026
2
डिजिटल काळात ही शेतकऱ्यांना सातबारा साठी मारावे लागत वारंवार चक्र..
महाराष्ट्र

डिजिटल काळात ही शेतकऱ्यांना सातबारा साठी मारावे लागत वारंवार चक्र..

August 14, 2026
1
📰 महान गावात आदिवासी मिरवणुकीदरम्यान वाद; PSIसह पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण
महाराष्ट्र

📰 महान गावात आदिवासी मिरवणुकीदरम्यान वाद; PSIसह पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण

August 14, 2026
6
श्रीरामपूरात उबाठा शिवसेनेकडून आण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त अभिवादन
महाराष्ट्र

श्रीरामपूरात उबाठा शिवसेनेकडून आण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त अभिवादन

August 14, 2026
1
महाराष्ट्र

श्रीरामपूरमध्ये माती परीक्षण, संतुलित खत व्यवस्थापनावर भर

August 14, 2026
0
बाबु कोकाट यांचा कुलगुरू प्रा.डॉ.इन्द्र मणि यांच्या हस्ते सन्मान
महाराष्ट्र

बाबु कोकाट यांचा कुलगुरू प्रा.डॉ.इन्द्र मणि यांच्या हस्ते सन्मान

August 14, 2026
1
Next Post
“लोहरा येथील थरारक घटना; मानवत-चारठाणा पोलिसांची धडक कामगिरी”

"लोहरा येथील थरारक घटना; मानवत-चारठाणा पोलिसांची धडक कामगिरी"

ताज्या बातम्या

पावसाच्या सरींतही पनवेल मध्ये तिरंगा पदयात्रेचा जल्लोष!

पावसाच्या सरींतही पनवेल मध्ये तिरंगा पदयात्रेचा जल्लोष!

August 14, 2026
डिजिटल काळात ही शेतकऱ्यांना सातबारा साठी मारावे लागत वारंवार चक्र..

डिजिटल काळात ही शेतकऱ्यांना सातबारा साठी मारावे लागत वारंवार चक्र..

August 14, 2026
मौजे चांदज तालुका माढा जिल्हा सोलापूर करांच्या शिरपेचात मानाचा तुरा…

मौजे चांदज तालुका माढा जिल्हा सोलापूर करांच्या शिरपेचात मानाचा तुरा…

August 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In