जालना : नवीन निविदा प्रक्रिया पूर्ण न झाल्याने तसेच वेतन न मिळाल्याने काम बंद करण्याचा इशारा कामगार संघटनेने महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना दिलेल्या पत्राद्वारे दिला आहे.
कामगार संघटनेने दिलेल्या पत्रानुसार, रूद्र एजन्सी यांच्या कडे एप्रिल महिन्याचे वेतन तीन महिने होऊनही अद्याप पेमेंट केलेले नाही. तसेच
महावितरणच्या कार्यालयात झालेल्या चर्चेनुसार, १ मे पासून नवीन निविदा प्रक्रिया पूर्ण करून नवीन एजन्सीला जिल्ह्यातील बाह्यस्त्रोत यंत्रचालकांचे पेमेंट मे, जून, व जुलै महिन्याचे पेमेंट देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, पत्र देऊन दोन महिने पूर्ण होऊनही निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने वीज यंत्रणेवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे. कामगाराला अपघात झाल्यास त्याची जबाबदारी कोणाची? असा सवाल उपस्थित करत, तातडीने निविदा प्रक्रिया पूर्ण करून संबंधित एजन्सीमार्फत थकीत वेतन देण्याची मागणी करण्यात आली आहे.
पत्रात पुढे स्पष्ट करण्यात आले आहे की, थकीत वेतन अदा न झाल्यास आणि निविदा प्रक्रिया पूर्ण न झाल्यास दिनांक १० जुलैपासून सर्व बाह्यस्त्रोत यंत्रचालक बेमुदत काम बंद आंदोलन करतील, असा इशारा देऊनही आणखी कोणतीही ठाम भूमिका महावितरण कंपनीने घेतली नाही. त्यामुळे महावितरण प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन कामगारांचे थकीत वेतन तातडीने अदा करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
व नविन निविदा (टेंडर) चालू करून उर्वरित मे ते जुलै पर्यंतचे पेमेंट लवकरात लवकर मार्गी लावावे.
परतूर तालुका प्रतिनिधी,
आकाश साळवे









