विहामांडवा : येथील आर. वात. पी. कला महाविद्यालयात ८० वा भारतीय स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. भारतीय ध्वज संहितेनुसार प्राचार्य डॉ सुधाकर गीरे यांचे हस्ते ध्वजारोहण सोहळा सकाळी ठीक ७.३५ वा.संपन्न झाला.
भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य ठेवून प्रबोधनपर कार्यक्रमाची सुरूवात संस्थेच्या प्रमुख मा. सलमा सय्यद जाकेर यांच्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा पर संदेशाने झाली. महाविद्यालयात इतिहास विभागप्रमुख प्रा.दत्ता साबळे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. त्यांनी ‘भारतीय स्वातंत्र्याचा लढा आणि देशभक्ती’ या विषयाच्या अनुषंगाने सविस्तर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
तसेच मराठी विभागप्रमुख व करिअर कट्टा समन्वयक प्रा. डॉ.संजय शिंदे यांनी इतिहास विसरून चालणार नाही परंतू भविष्याच्या दृष्टीने युवकांना एका दृढ निश्चयाने संकल्प करण्याची गरज आहे. असे आवाहन केले. तत्पूर्वी हिंदी व सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. डॉ.चंद्रकांत जोगदंड यांनी नशा मुक्त विचारांची शपथ दिली व व्यसनाच्या वाईट सवयी पासून दूर रहावे असे सांगितले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ सुधाकर गीरे यांनी अध्यक्षीय समारोपात आपला इतिहास भविष्य या दोन्ही अत्यंत महत्त्वाचे आहेत. ते जतन करावे आणि विकसित भारताचे स्वप्नात युवकांवर जास्त जबाबदारी आहे. असे सांगून ९ ते १७ आगस्ट ‘ हर घर तिरंगा अभियान ‘ सुरू असून तो देशभक्तीचा उर्जास्त्रोत आहे असे मत व्यक्त केले. याप्रसंगी प्रा. डॉ. अजय बढे, दिनेश ससाणे, फेरोज सय्यद, शरीफ शेख, ओम नवपुते,फारूख शेख, आदी कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.विकास बेळगे व आभार श्री गणेश करंगळ यांनी केले. या कार्यक्रमासाठी करिअर संसदेच्या पदाधिकारी म्हणून कु. वैष्णवी गाभूड आणि आपले मनोगत व्यक्त केले. तर परवेज शेख, रूषिकेश सोहळे, आकाश पवार, संदीप पालवे या सोबतच राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व पालक बहुसंख्येने उपस्थित होते.










