प्रतिनिधी :-
विवेक आर महाले
एरंडोल
आडगाव ता. एरंडोल येथील ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभाराविरोधात सामजिक कार्यकते श्रो. धनराज नवल अहिरे आणि ग्रा.प. सदस्या सौ.वैशाली धनराज अहिरे यांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे. त्यांनी ग्रामपंयतीतील विविध कामांमध्ये कथित अनियमितता, निकृष्ठ दर्जाची विकासकामे, पाणीपुरवठा योजनेतील प्रश्र तसेच अर्थिक व्यवहारांबाबत चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशा विवीध मागण्या त्यांनी जिल्हा परीषद समोर शुक्रवार दि.१४ ऑगस्टपासून आमरण उपोषण पुकारले आहे.
आडगाव गा.प हददीतील केंद्रा जवळील विहरीत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात दोषींवर कारवाई करून त्यावर आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. या घटनेची सखोल चौकशी करूण संबंधीतांची जबाबदारी निश्चीत करण्याची मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे.
जलजीवन मिशन अंतर्गत गावातील पाणीपुरवठा योजनेसाठी सुमारे 3.75 कोटी रुपये खर्च करूनही गावातील नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे या योजनेच्या कामाची संपूर्ण चौकशी करून निधीचा विनियोग कामाची गुणवत्ता आणि प्रत्यक्ष पाणीपुरवठ्याची स्थिती तपासावी अशी मागणी करण्यात आली आहे.
ग्रामपंचायतच्या घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीच्या रकमे संदर्भातही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत वसुली झालेली रक्कम नियमानुसार बँकेत जमा झाली आहे का त्याची तपासणी करून आर्थिक व्यवहारांची चौकशी करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
गावातील विविध विकास कामे निकृष्ट दर्जाची झाल्याचा आरोप करत संबंधित कामाची गुणवत्ता तपासावी आणि दोष आढळल्यास संबंधितावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे तसेच ग्रामपंचायत येथील कथित ई टेंडर घोटाळ्याची ही चौकशी करून त्यामध्ये अनियमत्तता आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी उपोषणकर यांनी केली आहे.
याशिवाय 14 वा वित्त आयोग तसेच अन्य निधीतून करण्यात आलेल्या कामांंबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत प्रत्यक्ष काम न करता दोन वेळा पैसे काढण्यात आल्याचा आरोप करण्यात आला असून भोकर अंगणवाडीच्या दुरुस्तीच्या कामातही आर्थिक अनियमत्तता झाल्याचा दावा निवेदनातून करण्यात आला आहे या सर्व बाबींची कागदपत्रांच्या आधारे चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे
उपोषण कर्त्यांनी यापूर्वी विविध तारखांना प्रशासनाकडे तक्रारी व निवेदन देऊनही अपेक्षित कारवाई झालेली नसल्याचा आरोप केला आहे संबंधित प्रकरणांमध्ये गट विकास अधिकाऱ्यांची ही चौकशी करून कारवाई करावी तसेच प्रलंबित मागण्यांकडे तातडीने लक्ष देऊन निर्णय घ्यावा.
या मागण्यांकडे सरकारने गांभीर्याने लक्ष देऊन संबंधित प्रकरणांची निष्पक्ष चौकशी करून दोष आढळल्यास जबाबदार व्यक्तींवर नियमानुसार कारवाई करावी आणि गावातील नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर तातडीने उपाययोजना कराव्यात अशी भूमिका श्री धनराज अहिरे व सौ.वैशाली अहिरे यांनी घेतली आहे. मागण्यांची पूर्तता होईपर्यंत आमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे याप्रसंगी नामदेव पाटील, विश्वास पाटील, महादू माळी, देविदास पवार, अनिल पाटील, गुलाब माळी, नामदेव पाटील, संतोष कोळी, रवींद्र पाटील,
देविदास पाटील आदी उपस्थित आहेत.










