प्रतिनिधी – आलोक बांडे
मालेगाव जहागीर (वाशीम)
पवित्र रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून, महाराष्ट्र विधान परिषदेच्या आदरणीय आमदार तथा शिवसेना पक्षाच्या नेत्या सौ. भावनाताई गवळी पाटील यांनी मालेगाव मधील प्रत्येक भावाला प्रेमाची आणि विश्वासाची साक्ष म्हणून खास राख्या पाठवल्या आहेत. ताईंनी पाठवलेल्या या राख्यांमुळे येथील प्रत्येक लाडक्या भावाचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.
या स्नेहवर्धक उपक्रमांतर्गत मालेगाव जहागीर येथील महिला व भगिनींनाही रक्षापौर्णिमेची भेट व राखयांचे उत्साहात वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना आमदार भावनाताई गवळी यांनी, “रक्षाबंधन हा बहीण-भावाच्या अतूट प्रेमाचा आणि पवित्र विश्वासाचा सण आहे. महिलांचा सन्मान, सुरक्षा आणि त्यांचे सक्षमीकरण हेच आपले नेहमी प्राधान्य राहिले आहे,” असे सांगत परिसरातील सर्व माता-भगिनींना आणि लाडक्या भावांना रक्षापौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
आमदार ताईंनी गावोगावी आपल्या प्रत्येक भावाला आवर्जून राख्या पाठवल्यामुळे स्थानिक शिवसैनिक व नागरिकांमध्ये प्रचंड उत्साहाचे व आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. याप्रसंगी परिसरातील नागरिक, महिला भगिनी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता उपस्थितांना मिष्ठान्न वाटप करून आणि सणाच्या गोड शुभेच्छा देऊन करण्यात आली.









