प्रतिनिधी :दरिकांत कोळेकर .
वृत्तसेवा :परवा नेपाळ देशात महापुरामुळे जलप्रलय आपत्ती उद्धभवली त्यामुळे शेकडो लोकांचे जीवितहानी झाली कित्येक नागरिक बेपत्ता झाली आहेत.
उत्तरेला चीन चा भाग असल्यामुळे तेथील हिमालयाच्या अतिउचं हिमपर्वत रांगानी वेढलेल्या भागातून महाभयंकर जलप्रलंय आले होते. तेथील घरे पत्त्याच्या पानाप्रमाणे पडून वहात जात होते. 80 ते 100फूट उंची ची लाटेत सगळं होत्याचे नव्हते झाले.
पृथ्वीवरील स्वर्ग म्हणून हिमालय भागातील नेपाळ हा देशाकडे पाहिले जाते. भारत देशाला लागून असल्यामुळे या देशात जाण्यासाठी पासपोर्टची आवश्यकता नाही. त्यामुळे अनेक भारतीय नागरिक याठिकाणी जात असतात.या दरम्यान अनेक भारतीय नागरिक मानस सरोवर, काटमांडू इत्यादी ठिकाणी गेले होते, जवळपास सर्व व्यवस्थित परत भारत देशात आले आहेत. काही बेपत्ता असल्याचेही कळते. देव करो सगळे सुखरूप भारतदेशात येवोत.
अतिउचं भागातून हिमपर्वत कडे ढासळून जलमार्गाने जोरात आल्याने नदी किनारील भागात अतिउंच लाटानी अनेक घरे वाहतुकीची साधने, पूल, रस्ते,वीज, शेती आणि मानवी जीवितहानी यामुळे नेपाळ ला मोठी आर्थिकहानी पोहचली आहे.
तसा हा भाग सधन होता, या देशात आज अखेर कोणाचेही आक्रमणे झाली नाहीत. स्वतः चे अस्तित्व निर्माण करीत याठिकाणी गुरखा नागरिक जगत असताना अशी घटना म्हणजे परकीय आक्रमण तरी नसेल ना अशी शंका निर्माण होते. मात्र या देशाला जवळील देशांनी मदत करण्यास सुरुवात केली आहे. चीन देशानेही आपत्ती निवारण मदत कार्य चालू ठेवले होते.
नेपाळ देशाला सध्या मदतीची गरज असून भारत देशाकडून मदत देईलच पण आपण सर्वानी आपल्या परीने होता होईल तेवढे मदत करून माणुसकी जपू या.









