प्रतिनिधी श्रीगोंदा
आज 3 सप्टेंबर 2026 रोजी ग्रामीण विकास केंद्र व मासूम संविधान संवर्धन फेलोशिप कार्यक्रम आयोजित 31 ऑगस्ट भटके विमुक्त दिनानिमित्त समाज प्रबोधन मेळावा तसेच शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत त्यांना जात प्रमाणपत्र व रेशन कार्ड वितरण कार्यक्रम जोशी वस्ती ता.श्रीगोंदा जि. अहिल्यानगर येथे घेण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेचे पुष्पहार करून केले.उद्घाटक मा. अहिल्यानगर दक्षिणचे लोकसभा मतदार संघाचे खासदार निलेश लंके साहेब कार्यक्रमाचे अध्यक्ष उमाताई जाधव होत्या व रूपचंद सावंत प्रशांत खामकर संभाजी बोरुडे इगावे भाऊसाहेब पुष्कर कडू API इत्यादी प्रमुख पाहुणे उपस्थित होते .प्रस्तावना लता शिंदे यांनी केली देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पाच वर्षांनी भटक्यांना स्वातंत्र्य मिळाले भटक्यांसाठी 31ऑगस्ट हाच खरा स्वातंत्र्य दिन आहे. तेव्हा राज्यभर हा दिवस मुक्तीचा दिवस म्हणून आनंद उत्सवाने साजरा केला जातो भटके विमुक्तांचा हक्क अधिकारावर बोलले जाते इंग्रजांनी केलेल्या अत्याचारावर बोलले जाते सध्या स्थितीत भटके विमुक्तांच्या होत असलेल्या हाल अपेष्टा बाबत बोलले जाते भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकार भटक्यांना मिळाले पाहिजे यांवर भाष्य केले जाते 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला आपला देश स्वतंत्र झाला पण आपल्या देशातील भटकंती करून जगणाऱ्या आपलेच बांधव इंग्रजांच्या 1871 च्या जन्मजात गुन्हेगारी कायद्यानुसार त्यांच्या शिरावर लागलेल्या गुन्हेगारीच्या शिक्यामुळे स्वातंत्र्य भारतात गावकोसाबाहेर पालावर पारतंत्र्यातच जगले हो इंग्रजांनी भटक्यांवर लाभलेला हा गुन्ह्यागाराच्या शिक्का पुसून त्यांना स्वातंत्र्य अस्तित्व निर्माण करण्यासाठी स्वातंत्र्यानंतर आणखी पाच वर्षे प्रतीक्षा करावी लागली 31 ऑगस्ट 1952 रोजी तात्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू नी यांचं महाराष्ट्राच्या भूमीत सोलापूर येथे भटक्यांच्या शिरावरील गुन्हेगारीचा शिक्का पुसून हे कुंपण तोडले आणि देशातील भटक्या बांधवांना विमुक्त केले या कुंपणातील 14 जाती विमुक्त झाल्या आणि अन्य 38 जाती भटक्या राहिल्या आणि तेथूनच भटके विमुक्त ही बिरुदावली भावंडांच्या जातीमागे लागलेली 31 ऑगस्ट हा भटके विमुक्त दिन खऱ्या अर्थाने या बांधवांचा स्वातंत्र्य दिन पण गेल्या 75 ते 80 वर्षात भटक्या विमुक्त समाजाने या देशातील स्वातंत्र्य खरं अनुभवलं की आजही हा समाज मुख्य प्रवरापासून कोसो दूर आहे यांचे चिंतन होणे काळाची गरज आहे आज महाराष्ट्रातील दीड कोटी आणि संपूर्ण भारतात 20 कोटीच्या आसपास भटके विमुक्त समाज आहे पण राजकीय सामाजिक शैक्षणिक आर्थिक अशा विविध स्तरावर ती दीर्घकाळ प्रयत्न होऊनही भटके विमुक्त समाजाचे अनेक मूलभूत प्रश्न आजही प्रलंबित आहेत या समाजाचा संघटित आवाज अधिक प्रबळ करून शासनापर्यंत पोहोचणे पोचवण्याची आवश्यकता आहे या समाजाचा आवाज ऐकायला जावा हा समाज संघटित व्हावा या समाजाला खंबीर राजकीय नेतृत्व मिळावा ही बाब खूप मोठी आहे या समाजाच्या वेदना संघर्ष याची जाणीव करून देणे भटक्यांना भटके विमुक्त डीएनटी समाजात समाविष्ट जवळपास 52 जाती असून या समाजातील अनेक प्रथा परंपरा आज नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत त्या प्रथांचे परंपराचे त्यांच्या संस्कृतीचे संवर्धन होणे काळाची गरज आहे आजच्या घडीला या समाजाला राजकीय पाठबळासोबत शासनाचा आधार गरजेचा झाला पाहिजे अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा सोबत विविध शासकीय योजनांचा लाभ शिक्षण आरोग्य रोजगार या गरजावरही लक्ष देणे गरजेचे आहे भटके विमुक्त समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रचंड संघर्षाचा सामना करावा लागत आहे नंतर आलेली प्रमुख पाहुणे यांनी व्याख्याते प्रशांत खामकर सरांनी त्यांच्या विधा परंपरा ब्रिटिश काळातील काय जाचक नियम होते याबद्दल मार्गदर्शन केले त्यानंतर संभाजी आप्पा बोरुडे यांनी भारतीय संविधान अमलात आल्यापासून काय तरतुदी झाल्या आणि भारत स्वतंत्र च्या अगोदर कशा पद्धतीने होता भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतर काय परिस्थिती झाली भटक्यांचे नेते रूपचंद भाऊ सावंत भटक्यांची स्थिती काय आहे याच्यावरती मांडणी केली त्यानंतर पुष्पकर कडू API यांनी गुन्हेगारीच्या कायद्यांवरती माहिती दिली 31 ऑगस्ट च्या शुभेच्छा दिल्या ग्रामीण विकास केंद्राच्या सचिवा उमाताई जाधव यांनी 31 ऑगस्ट दिनाची पार्श्वभूमी विषयी माहिती दिली आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले त्यानंतर कार्यक्रमाचे उद्घाटक अहिल्यानगर लोकसभा दक्षिणचे आदरणीय खासदार निलेश लंके साहेब यांनी भटके विमुक्त दिनाविषयी शुभेच्छा दिल्या त्यानंतर त्यांनी भटक्यांच्या स्थिती वरती मार्गदर्शन केले मुलांच्या शिक्षणावरती आरोग्यावरती रोजगारावरती प्रखटपणे असे मार्गदर्शन केले तसेच भटक्या विमुक्तांची स्थिती लक्षात घेता भटक्या विमुक्तांना कुठल्या पद्धतीचे शासकीय अधिकार मिळेल जात नाही त्यांचे हक्क मिळले जात नाही घरकुल नाही जागा नाही आधार कार्ड नाही मतदान कार्ड नाही जातीचे दाखले नाही अशा अनेक अडचणींना सामना करावा लागतो त्यांची जनगणना नाही भटक्यांचा रखाना कॉलम तसाच आहे तो भरलेला नाही भटके विमुक्त आजही विमुक्त झाले तरी सगळ्या शासकीय योजने पासून कोसो दूर आहे त्यांना अजून पर्यंत भटकंती करावी लागते अन्याय सहन करावा लागतो यासाठी सर्वात प्रथम हे सर्व भटके मुक्त शासकीय जागेमध्ये गेल्या 40-50 वर्षांपासून रहिवासी आहेत तर त्यांना सर्वात प्रथम त्यांची राहती जागा कायमस्वरूपी चे त्यांच्या नावे व त्यांच्या नावे सातबारा मिळावे यासाठी काम करणार आणि कुठलेही डॉक्युमेंट असो त्याच्यासाठी स्वतः त्यांच्या बाजूने उभे राहून ते डॉक्युमेंट त्यांना कसे मिळतील यासाठी पुढचे काम असेल माझे कुठलाही भटके मुक्त आदिवासी योजनेपासून व नागरिकत्वाच्या पुराव्या पासून वंचित राहणार नाही त्यांच्या बाजूने उभे राहून काम करणार असे ठामपणे मार्गदर्शन व विश्वास दिला की माझ्या इथल्या गरीब माणसांमध्ये देव पहा तुम्हाला देवळात देव दिसणार नाही पण माझ्या गरीबांमध्ये तुम्हाला देव दिसेल इथल्या शासकीय यंत्रणेला अधिकाऱ्यांना साहेबांनी सांगितले जोशी वस्ती गावाला प्रवेशद्वार देणार असा विश्वास दिला तर भटके विमुक्त समाजातील लोकांना जात प्रमाणपत्र वाटप करण्यात आले व रेशन कार्ड वाटप करण्यात आले दीडशे जात प्रमाणपत्र 20 रेशन कार्ड आदरणीय खासदार साहेब निलेश लंके साहेबांच्या हस्ते वाटप करण्यात आले त्यानंतर हे दीडशे जातप्रमाणपत्र काढून दिल्याबद्दल अहिल्यानगर लोकसभा दक्षिणचे खासदार आदरणीय निलेश लंके साहेब यांच्या हस्ते छोटासा लता शिंदे यांचा सन्मान करण्यात आला या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष चव्हाण सर यांनी केले.
यावेळीग्रामीण श्रीगोंदा तालुक्याचे तहसीलचे सहाय्यक अधिकारी कारकिले भाऊसाहेब आदिवासी युवा क्रांती संघटनेचे अजित भाऊ भोसले भटक्या विमुक्त सामाजिक कार्यकर्त्या लता शिंदे जिल्हा प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक ईश्वर गोरे सर ग्रामीण विकास केंद्राच्या कार्यकर्त्या पल्लवीताई शेलार राजश्रीताई लष्करे ऋषिकेश गायकवाड राहुल पवार मुमताज मुलानी राजु शिंदे सुनील लष्करे रोहित रोडे गंगाराम मले भिवा वीरकर भारत माळवे मोहन बाबर दादाजी शिंदे कचरू वाहेकर सचिन मुंडेकर विकास वाहेकर अनिल पोटे अनिता केदळे सिंधूताई शिंदे गणेश तांबवे उपस्थित होते