शेतातील पिके करपत आहेत, विहिरींनी तळ गाठला आहे, बोअरवेल बंद पडत आहेत तर जलाशयांमधील पाणीसाठ्यात देखील मोठी घट होत आहे. एकंदरीतच बळीराजा मोठ्या अडचणीत सापडला आहे..
या पार्श्वभूमीवर तत्काळ दुष्काळ घोषित करून दुष्काळ सवलती लागू करणे गरजेचे आहे. तसेच जुन्या ट्रिगरसह एक रुपयात पिक विमा लागू करणे, कर्जमाफीची प्रभावी अंमलबजावणी करणे, शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये आर्थिक मदत करणे, चारा छावण्या उभारणे, पाणीटंचाई असेल तिथे पाण्याच्या टँकरची व्यवस्था करणे, दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे संपूर्ण शैक्षणिक शुल्क माफ करणे, रोजगार हमी योजनेची व्याप्ती वाढवणे या बाबी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत.
जागतिक हवामान संघटनेच्या म्हणण्यानुसार एल निनोचा प्रभाव सातत्याने वाढत असून यामुळे तापमानात तीव्र वाढ, पाणीटंचाई व दुष्काळी परिस्थिती ओढावणार आहे. या अनुषंगाने सरकारने तत्काळ उपाययोजना करण्याची विनंती तहसीलदार साहेबांना निवेदना द्वारे केली आहे.
यावेळी उपस्थित सोमेश्वर भाऊ कदम(प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी श.प ),चंद्रकात मद्दे(ता.अध्यक्ष कॉंग्रेस अहमदपूर),सिरजोद्दीन जहागीरदार(अल्पसंख्याक जि.अध्यक्ष लातूर) केदार आप्पा काडवादे (मा.जि.सरचिटणीस राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी श.प) संग्राम पवार(ता.अध्यक्ष राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस श.प)विकास महाजन (शहर अध्यक्ष कॉंग्रेस अहमदपूर)गणेश माने(उप ता प्रमूख शिवसेना उ.बा.ठा अहमदपूर),मेजर काझी(मा.जि उपाध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी श.प)अक्षय काडवादे खंडेराव शेवाळे,पंडितराव बोडके,शिवाजी जंगापल्ले जुबेर बागवान,इरफान पठाण,सद्दाम पठाण,चांदपाशा शेख,रूपेश कांबळे,गणेश भदाडे,अरुण सुरवंशी,बालाजी देवकत्ते
Devendra Fadnavis
Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे
Sunetra Ajit Pawar
Dattatray Bharane









