
महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक पटलावर स्वतःच्या कार्यकर्तृत्वान आणि अफाट जनसंपर्काच्या बळावर एक अढळ स्थान निर्माण करणारे जेष्ठ नेते ,माजी मंत्री आदरणीय बबनराव पाचपुते (दादा) काष्टी तालुका श्रीगोंदा येथील एका सामान्य शेतकरी कुटुंबातून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज राज्याच्या नेतृत्वापर्यंत पोहचला आहे. केवळ नेतृत्वगुण आणि जनसामान्यांशी असलेली नाळ यांच्या बळावर त्यांनी चार दशकाहून अधिक काळ जनमानसावर अधिराज्य गाजवले आहे.
संघर्षातून उगम पावलेले नेतृत्व
तरुण वयात आईच्या इच्छेनुसार वकील होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या बबनराव दादांचे महाविद्यालयीन जीवन अहमदनगर मध्ये सुरू झाले. तेथेच त्यांच्यातील संवेदनशील नेतृत्वाची पहिली ठिणगी पडली. ग्रामीण आणि शहरी विद्यार्थ्यांमधील भेदभाव आणि फी माफीचे आंदोलन यामुळे ते विद्यार्थ्यांचे नेते बनले. कॉलेजचे जनरल सेक्रेटरी म्हणून त्यांनी पहिली निवडणूक जिंकली आणि त्यांच्या राजकीय प्रवासाची पायाभरणी झाली.
1980 मध्ये पहिल्यांदा विधानसभेत निवडून येत त्यांनी श्रीगोंद्याच्या विकासाचे नवे पर्व सुरू केले. गृहराज्यमंत्री , वनमंत्री, आदिवासी विकास मंत्री अशा अनेक महत्त्वपूर्ण पदांची जबाबदारी सांभाळत असताना त्यांनी प्रशासनावर आपली मजबूत पकड दाखवून दिली .1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणूनही त्यांनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली.
2019 मध्ये त्यांनी श्रीगोंद्यात पहिल्यांदा भाजपचे कमळ फुलवले आणि 2024 च्या निवडणुकीत सुपुत्र विक्रम पाचपुते यांच्या पाठीशी भक्कम ताकद उभी करून त्यांना आमदार म्हणून विधानसभेत पाठवले.
विकासाचा ध्यास आणि शैक्षणिक क्रांती
श्रीगोंदा तालुक्याला दुष्काळाच्या छायेतून बाहेर काढण्यासाठी कुकडीच्या पाण्याचा प्रश्न असो की स्थानिक पायाभूत सुविधा ,दादांनी नेहमीच आक्रमकपणे आणि दूरदृष्टीने काम केले. राजकारणासोबत त्यांनी ग्रामीण भागातील मुला – मुलींना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी ‘ परिक्रमा ‘ ( Hon.Babanrao Pachpute Vichardhara Trust ) सारख्या शिक्षण संस्थेची उभारणी करून शैक्षणिक क्रांती घडवून आणली.
‘ माणूस ‘ जपणारा लोकनेता
मंत्रिपदाचा दिवा असो वा नसो ,बबनराव पाचपुते दादांच्या वागण्या बोलण्यात आणि जनसंपर्कात कधीही बदल झाला नाही .सामान्य माणसाच्या सुख – दुःखात धाऊन जाणे,रात्री अपरात्री केंव्हाही फोनवर सहज उपलब्ध असणे आणि अडकलेल्या कामांना मार्ग दाखवणे हा त्यांचा स्थायीभाव आहे.विरोधक असला तरी त्याला संकटसमयी मदत करण्याची त्यांची वृत्ती त्यांना खऱ्या अर्थाने ‘ लोकसंग्रहक नेता ‘ बनवते.
आजही तितक्याच उत्साहाने लोकांमध्ये रमणारे आणि आमदार विक्रम पाचपुते यांच्या रूपाने नव्या पिढीला मार्गदर्शन करणारे दादा म्हणजे श्रीगोंद्याचा ऊर्जास्रोत आहेत.
अशा या लोकशाहीच्या खंद्या शिलेदाराला आणि जनसामान्यांच्या जनकास नऊ सप्तेबर या दिवशी म्हणजेच वाढदिवसाच्या अनंत कोटी शुभेछा! दादांना उदंड ,निरोगी आणि दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना .
