मराठी भाषेला मोठा वारसा अन् परंपरा
मराठी भाषेला महानुभवापासून ते अगदी अलिकडच्या मोबाईल युगातील मराठी परंपरेचा एक दीर्घ वारसा लाभलेला आहे. ज्ञानेश्वरांपासून ते अगदी अत्याधुनिक काळात आणि युवा साहित्य अकादमी विजेत्यापर्यंत मराठी बोली आणि मराठी प्रादेशिक बोली असा फरक केला गेला असला तरी या दोन्हीमध्येही मराठी साहित्य निर्मिती ही विपुल झाली आहे.
विपुलतेचे प्रमाण हे मराठी बोलीला एकदमच प्राप्त झाले नाही तर त्यासाठी प्राचीन मराठी वाङ्मयापासून ते आधुनिक मराठी वाङ्मयापर्यंतचा वारसा लाभला आहे. या वारसा परंपरेतील एक नाव म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज. कुसुमाग्रजांनी मराठी कविता उंच पातळीवर नेऊन ठेवली. त्यामुळे भारत सरकारतर्फे त्यांना ज्ञानपीठ पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यांच्या जन्मदिवस म्हणून महाराष्ट्र सरकारच्या वतीने 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो.
Discussion about this post